शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
4
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
5
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
6
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
7
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
8
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
9
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
10
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
11
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
12
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
13
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
14
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
15
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
16
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
17
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
18
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
19
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
20
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
Daily Top 2Weekly Top 5

'मी जिवंत आहे तोपर्यंत लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही', CM सरमांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 15:17 IST

Muslim Marriage And Divorce Act: आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाले आहे.

Assam CM Attack On Congress:आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरू झाले असून, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लहान मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे बिस्वा सरमा म्हणाले.

विधानसभेच्या अधिवेशनाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 'काँग्रेसवाल्या लोकांनी ऐकावे, मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत राज्यात बालविवाह होऊ देणार नाही. तुम्ही मुस्लिम समाजाच्या मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी उघडलेले दुकान आम्ही पूर्णपणे बंद करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हिमंता बिस्वा सरमा यांचा ठरावमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 2026 पर्यंत राज्यातील बालविवाह पूर्णपणे बंद करण्याचे ठरवले आहे. सभागृहात विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, मी तुम्हा लोकांना राजकीय आव्हान देतो की, मी तुमचे हे दुकान 2026 पर्यंत बंद करेन. आसाममधून बालविवाह पूर्णपणे संपुष्टात येईल. बालविवाह संपवण्यासाठी राज्यव्यापी मिशन सुरू केले जाईल, ज्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होतील. काही लोक म्हणतात की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, परंतु तिहेरी तलाक, बालविवाह आणि बहुपत्नीत्व संपवण्यासाठी आम्ही काँग्रेसपेक्षा जास्त काम केले आहे.

AIUDF चा विरोधएआययूडीएफसह सर्व मुस्लिम संघटनांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. एआययूडीएफचे आमदार अश्रफुल हुसैन म्हणाले की, भाजप सरकार मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी हे करत आहे. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला होता, परंतु सभापतींनी आम्हाला परवानगी दिली नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमचा स्पीकर बंद केला. हे कायदे काढून या लोकांना मुस्लिमांचे हक्क संपवायचे आहेत. असेच चालू राहिल्यास आसाममध्ये हुकूमशाही लागू होईल, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :AssamआसामChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाMuslimमुस्लीम