शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

'मी जिवंत आहे तोपर्यंत लहान मुलींचे लग्न होऊ देणार नाही', CM सरमांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 15:17 IST

Muslim Marriage And Divorce Act: आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाले आहे.

Assam CM Attack On Congress:आसाममधील भाजप सरकारने राज्यात मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. आता यावरुन राज्यातील राजकारण तापायला सुरू झाले असून, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत लहान मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे बिस्वा सरमा म्हणाले.

विधानसभेच्या अधिवेशनाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. 'काँग्रेसवाल्या लोकांनी ऐकावे, मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत राज्यात बालविवाह होऊ देणार नाही. तुम्ही मुस्लिम समाजाच्या मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी उघडलेले दुकान आम्ही पूर्णपणे बंद करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हिमंता बिस्वा सरमा यांचा ठरावमुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 2026 पर्यंत राज्यातील बालविवाह पूर्णपणे बंद करण्याचे ठरवले आहे. सभागृहात विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, मी तुम्हा लोकांना राजकीय आव्हान देतो की, मी तुमचे हे दुकान 2026 पर्यंत बंद करेन. आसाममधून बालविवाह पूर्णपणे संपुष्टात येईल. बालविवाह संपवण्यासाठी राज्यव्यापी मिशन सुरू केले जाईल, ज्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होतील. काही लोक म्हणतात की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत, परंतु तिहेरी तलाक, बालविवाह आणि बहुपत्नीत्व संपवण्यासाठी आम्ही काँग्रेसपेक्षा जास्त काम केले आहे.

AIUDF चा विरोधएआययूडीएफसह सर्व मुस्लिम संघटनांनी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. एआययूडीएफचे आमदार अश्रफुल हुसैन म्हणाले की, भाजप सरकार मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी हे करत आहे. मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला होता, परंतु सभापतींनी आम्हाला परवानगी दिली नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमचा स्पीकर बंद केला. हे कायदे काढून या लोकांना मुस्लिमांचे हक्क संपवायचे आहेत. असेच चालू राहिल्यास आसाममध्ये हुकूमशाही लागू होईल, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :AssamआसामChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाMuslimमुस्लीम