शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

Mulayam Singh Yadav Death: पूर्वी शहीदांची टोपी घरी यायची, मुलायम सिहांनी पार्थिव पोहोचविण्याचा निर्णय घेतला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 11:44 IST

मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. शिक्षक असलेले मुलायम युपीच्या राजकारणाचे सर कधी झाले कोणालाच कळले नाही. 1967 मध्ये ते सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर सर्वात कमी वयात आमदार झाले आणि राजकारणात आले. 

दहा वेळा आमदार, सात वेळा खासदारकी भूषविणारे मुलायम किती कमी वयात राजकारणात आले असतील याचा विचार करा. हेच मुलायम १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ या काळात देशाचे संरक्षण मंत्री देखील होते. राजकीय अस्थिरतेचा काळ होता, याचवेळी मुलायम यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप महत्वाचा निर्णय घेतला. तुम्ही जुन्या सिनेमांमध्ये पाहिले असेल, सैनिक जेव्हा देशाच्या सीमेवर शहीद व्हायचा तेव्हा तो संदेश घेऊन सैन्याचा अधिकारी शहीदाच्या घरी दारात जायचा. त्या शहीदाच्या कुटुंबाला सैनिकाची टोपी, सैन्याचा ड्रेस दिला जायचा. आज शहीद सैनिकांचे पार्थिव त्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. हा निर्णय मुलायम सिहांनी घेतला होता. 

मुलायम सिंहांनी संरक्षण मंत्रीपद हाती घेताच आधी सैनिकांसाठीचा हा कायदा बदलला. एखाद्या गावातला सैनिक शहीद झाला तर त्याच्या घरी केवळ सैन्याचे अधिकारी नाहीत, तर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना देखील जाण्याचा नियम केला. यामुळे आज आपल्या जवानांना सन्मानाने अलविदा केले जाते. याच मुलायम सिहांनी सुखोई ३० लढाऊ विमानांची डील केली होती. मुलायमसिंग यादव 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 असे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. मुलायम सिंहांना गृह मंत्री पद हवे होते. परंतू, त्यांना संरक्षण मंत्री पद देण्यात आले. त्याचेही त्यांनी सोने केले.  

टॅग्स :Mulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवIndian Armyभारतीय जवान