शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

Mucormycosis: चिंतेत भर! देशभरात काळ्या बुरशीच्या आजाराचा कहर; रुग्णांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 10:50 IST

Mucormycosis: देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देदेशभरात काळ्या बुरशीचा कहररुग्णांची संख्या वाढलीउत्तर भारतात प्रमाण वाढले

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशभरात कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे म्युकरोमायसीस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. (mucormycosis black fungus patient increased in delhi rajasthan and maharashtra)

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच या आजारामुळे होणारे मृत्यूही वाढत आहेत. महाराष्ट्रात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून, मृत्यूचे प्रमाणही जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

उत्तर भारतात प्रमाण वाढले

केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशाच्या विविध राज्यांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमध्ये या आजाराचा धोका वाढताना दिसत आहे. राजस्थानमध्ये तर या आजाराला महामारी घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे या आजाराचे ५० रुग्ण आढळून आले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मेरठमध्ये ४२ रुग्ण आढळून आले असून, यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तेलंगण राज्याने एक नोटिफिकेशन जारी केले असून, सतर्कता आणि सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

“नितीन गडकरी काय सांगतात, हे त्यांचे बॉस ऐकतायत का?” काँग्रेसची विचारणा 

महाराष्ट्रात सर्वाधिक लागण

सर्वाधिक कोरोनाबाधित आणि कोरोनाच्या मृत्यूनंतर आता काळ्या बुरशीच्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव महाराष्ट्रात असल्याचे पाहायला मिळत आहे. या आजारामुळे आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दीड हजार रुग्णांना या आजाराची लागण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक १५० रुग्ण आढळून आले असून, १० ते १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या आजाराची लक्षणे उशिराने दिसून येत असल्यामुळे उपचार होण्यासही विलंब होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिसRajasthanराजस्थानdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेश