शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

MP Politics: मध्य प्रदेशात राजकीय भूकंप; मुख्यमंत्री कमलनाथ यांनी घेतले सर्व मंत्र्यांचे राजीनामे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:20 AM

Madhya Pradesh Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रात्री उशीरा कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. आणि ते मान्यही करण्यात आले आहेत. 

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे १७ आमदार बंगळुरुला आहेत. त्यामुळे कमलनाथ सरकारवर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मध्यप्रदेशातील भाजपाने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता आमदारांची बैठक बोलावली आहे. कमलनाथ यांनी सांगितले की, जे लोक माफियाच्या मदतीने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कधी यशस्वी होऊ देणार नाही. माझी सर्व ताकद आणि विश्वास मध्य प्रदेशातील जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे लोकांनी बनवलेल्या या सरकारला पाडण्याचं स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही असं ते म्हणाले. 

काय आहे कमलनाथ यांची योजना?कमलनाथ हे सरकारवर आलेल्या संकटापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नाराज चेहरे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्यात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. तेव्हा कमलनाथ यांनीही ज्यांना रस्त्यावर उतरायचे आहे त्यांनी उतरावे असे आव्हान दिले होते. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा