शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 21:50 IST

कमलनाथ यांचा भाजपाला धक्का

भोपाळ: कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडल्यानंतर मध्य प्रदेशातही याचीच पुनरावृत्ती होण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला धक्का बसला आहे. राज्य सरकारनं विधानसभेत सादर केलेल्या एका विधेयकाच्या बाजूनं भाजपाच्या दोन आमदारांनी मतदान केलं. विशेष म्हणजे मतदानावेळी भाजपाचे इतर सर्व आमदार अनुपस्थित होते. यानंतर भाजपानं दोन आमदारांवर टीका केली. आता या आमदारांना काँग्रेसनं अज्ञातस्थळी हलवलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कमलनाथ त्यांची भेट घेणार आहेत. विधानसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या भाजपा आमदारांनी काँग्रेसमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मेहर मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण त्रिपाठी आणि ब्योहारीचे आमदार शरद कौल यांनी काँग्रेस सरकारच्या बाजूनं मतदान केल्यानं त्यांच्यावर स्वपक्षानं टीका केली. यानंतर त्रिपाठींनी भाजपाला लक्ष्य केलं. भाजपा कायम खोटी आश्वासनं देते. मला मेहरचा विकास करायचा असून मी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबत आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.शरद कौल यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. मी आधी काँग्रेसमध्येच होतो. त्यामुळे काँग्रेसमध्ये गेल्यास ती घरवापसीच असेल, अशा शब्दांमध्ये कौल यांनी सूचक भाष्य केलं. भाजपाचे हे दोन बंडखोर आमदार लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं वृत्त टाईम्स नाऊनं दिलं आहे. तसं झाल्यास राज्यात भाजपाला धक्का बसेल. 

आज नेमकं काय घडलं?विधानसभेत गुन्हेगारी कायदा (सुधारणा) विधेयकावरील मतदानावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला साथ दिली. यावरुन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसकडून अल्पमतातलं सरकार चालवलं जातं. त्यांचं सरकार कधीही कोसळेल, असा दावा कायम भाजपाकडून केला जातो. मात्र विधानसभेत गुन्हेगारी कायद्यावरील सुधारणा विधेयकावरील मतदानादरम्यान भाजपाच्याच दोन आमदारांनी सरकारच्या बाजूनं मतदान केलं, असा टोला कमलनाथ यांनी लगावला. या विधेयकावरील मतदानादरम्यान कमलनाथ यांनी मतविभाजनाची मागणी केली होती. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली.  काल काय म्हणाले होते भाजपा नेते?भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातील काँग्रेस सरकार कोसळू शकतं, असे संकेत काल दिले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सपा-बसपामधील अंतर्गत लाथाळ्यांचा उल्लेख केला होता. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले होते.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस