शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

"१० वर्षांच्या नवसानंतर मुलगा झाला होता, पण..."; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:19 IST

दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एका पाच महिन्यांच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. बाळाच्या नातेवाईकांनी प्रशासन आणि महानगरपालिकेवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. साहू कुटुंबाचं म्हणणं आहे की, परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या गेल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. याच दूषित पाण्यामुळे पाच महिन्यांच्या मुलाचा बळी गेला.

मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता, त्यानंतर त्याची प्रकृती सतत बिघडत गेली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. चिमुकल्याच्या मृत्यूनंतर आई साधना साहू यांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. त्यांनी सांगितलं की, "जवळपास दहा वर्षांच्या नवसानंतर आणि प्रार्थनेनंतर आम्हाला मुलगा झाला होता."

दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा

"गर्भधारणेदरम्यान गंभीर प्रसूती समस्या होत्या, ज्यामुळं नऊ महिने बेड रेस्ट घ्यावी लागली होती. दूध कमी येत असल्याने बाहेरून दूध आणून बाळाला पाजावं लागत असे, ज्यामध्ये पाणी मिसळलं जायचं. तेच पाणी त्यांच्या बाळासाठी जीवघेणं ठरलं." या कुटुंबाने असाही आरोप केला आहे की, १० वर्षांच्या मुलीलाही सतत पोटदुखी आणि पोटाशी संबंधित त्रास होत आहेत.

यावरून हे स्पष्ट होतं की, परिसरातील पाणी लोकांच्या आरोग्यासाठी घातक बनले आहे. "माझं बाळ गेलं, पण माहिती नाही आणखी किती निष्पाप जीव यामुळे धोक्यात येती," अशी भीती आईने व्यक्त केली. आरोग्य विभागाची आकडेवारीही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करत आहे. विभागाच्या माहितीनुसार, दूषित पाण्यामुळे आतापर्यंत १४९ जण आजारी पडले आहेत, ज्यांना उलट्या-जुलाब आणि पोटाशी संबंधित तक्रारी आहेत. यापैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ten Years of Prayers, Then Loss: Mother's Heartbreak in Indore

Web Summary : Contaminated water in Indore claimed the life of a five-month-old, sparking outrage. The family alleges negligence led to the tragedy after repeated complaints were ignored. The mother grieves the loss of her child, born after a decade of prayers, fearing for other children. 149 others are sick; 7 deaths reported.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीmilkदूधDeathमृत्यू