शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

आईने स्मशानास बनवलं घर, १५ वर्षांपूर्वी घडला वेदनादायक अपघात; संपूर्ण कहाणीने डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 21:29 IST

A tragic accident happened 15 years ago :कहाणी अशी आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर, आई कधीही आपल्या प्रियजनांकडे परत आली नाही. तिने स्मशानभूमीला आपले घर बनवले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर आई त्याला स्वतःपासून वेगळे करू शकली नाही. 

सीकर - राजस्थानमधील सीकर येथील एका आईची कहाणी वाचून तुम्ही भावूक व्हाल. आजही ती पाणावलेले डोळे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या घेऊन आपल्या मुलाला शोधत आहे. वृद्ध महिला रोज डोळ्यात पाणी आणून एकच प्रश्न विचारते, कुठे आहे माझा मुलगा, माझा लाल. कहाणी अशी आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर, आई कधीही आपल्या प्रियजनांकडे परत आली नाही. तिने स्मशानभूमीला आपले घर बनवले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर आई त्याला स्वतःपासून वेगळे करू शकली नाही. 

लोक सांगतात की, राजू कंवर यांचा मुलगा 15 वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाला. तेव्हापासून ती श्मशानामधून बाहेर पडली नाही. ती तिथे राहू लागली. लोक म्हणतात, जेव्हा कोणी अंत्यसंस्कारासाठी येते तेव्हा स्मशानभूमीत महिला दिसते. ती लाकूड उचलते आणि लोकांना मदत करण्यासाठी येते. ती तहानलेल्यांना पाणी देते, पण स्मशानभूमीच्या बाहेर कुठेही जात नाही.

ही आई जेव्हा ओल्या डोळ्यांनी तिची दु:खद कहाणी सांगते तेव्हा लोकांचे हृदय तुटते. राजू कंवर सांगतात की, 2008 मध्ये तिचा 22 वर्षांचा मुलगा इंद्र एका भीषण रस्ता अपघाताचा बळी ठरला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयातही नेण्यात आले, मात्र लाखो प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. आईला शेवटच्या वेळी मुलाचा चेहराही पाहता आला नाही, याची तिला अजूनही खंत आहे. ती म्हणते, मी लोकांना विनवणी केली, मला माझ्या मुलाचा चेहरा शेवटच्या क्षणी पाहू द्या, परंतु कोणीही माझे ऐकले नाही. मला माझ्या मुलाचे शेवटचे दर्शन झाले नाही. माझं त्याच्याशिवाय या जगात कोणीच नाही. मी त्यांचे अंतिम संस्कार केले. आईला आपला मुलगा गमावल्याची इतकी खोल जखम झाली की, त्या दिवसापासून ती कधीही स्मशानभूमीच्या बाहेर गेली नाही.'तो मला विसरला, मी आई आहे कसं विसरु त्याला'आपल्या मुलाची आठवण करून, आई रडत रडत म्हणते, तो गेला. जग विसरले त्याला, पण मी कसं विसरणार. इथे माझा लाल झोपला आहे, माझा इंद्र. राजू कंवर सांगतात, 'मी माझ्या मुलाची अस्थिकलश घेऊन एकटाच हरिद्वारला गेले होते. विसर्जनानंतर ती परतली आणि स्मशानभूमीत आली. मग इथे राहू लागले. काही दिवस लोक काहीच बोलले नाहीत, मग अडवणूक, नकार देऊ लागले. मी कोणाचेच ऐकले नाही. इथून निघाले नाही. काही दिवस लोकांनी माझ्याशी बोलणे बंद केले. आता स्मशानभूमी माझे घर आहे.राजू कंवर ही महिला सीकर येथील रहिवासी असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्याचे मोठे कुटुंब आहे. नवरा जीवनात नाही. ती तिच्या एकुलत्या एक मुलासह तिच्या माहेरच्या घरी राहत होती. तिने आपल्या मुलाला शिकवण्यासाठी खूप कष्ट केले, त्याला सक्षम बनवले. मुलाच्या मृत्यूनंतर जणू तिचा संसारच संपला होता. जिथे आईने आपल्या मुलाचे अंत्यसंस्कार केले, आता ती तिथेच राहते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघातDeathमृत्यू