शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगे नेहरू, इंदिराजी आणि राजीव गांधींच्या काळात झाले, अमित शाहांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 20:40 IST

No Confidence motion : देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात भाषण करताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती लोकसभेत दिली. यावेळी अमित शाह यांनी मणिपूर आणि ईशान्य भारतामधील वांशिक दंगलींचा इतिहास मांडतानाच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू झाल्यावर अमित शाह म्हणाले की, आता मी विरोधकांनी जी काही राजकीय विधानं केली त्याबाबत बोलणार आहे. मी अध्यक्षांच्या माध्यमातून गौरव गोगोई यांना सांगू इच्छितो की, तसेच आकडेवारीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, या देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली ह्या जवाहरलाल नेहरू, इंजिरा गांधी आणि, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाले आहेत, असा दावा केला. तसेच यासाठी विविध दंगलीतील आकडेवारीही सभागृहासमोर मांडली.

ते पुढे म्हणाले की, मी एवढंच सांगू इच्छितो की, दंगली ह्या प्रत्येक काळात झाल्या आहेत. मात्र आम्ही कधी दंगलींना पक्षांसोबत जोडलं नाही. आम्ही कधी दंगलींबाबतचं उत्तर देताना कुठल्या गृहमंत्र्यांना रोखलेलं नाही. आम्ही कधी पंधरा पंधरा दिवस सभागृहाला वेठीस धरलेलं नाही. आम्ही विरोधात असतानाही शांतीचं आवाहन केलं आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत माहिती देताना अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही, असा भ्रम पसरवला गेला. मात्र मी या सभागृहासमोर स्पष्ट करू इच्छितो की, सभागृहाची सुरुवात होण्यापूर्वीपासून मी चर्चा करण्यास तयार असल्याचे अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं होतं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, मी मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांना चर्चा करायची नव्हती. दर माझ्या उत्तरानं समाधान झालं नसतं तर पंतप्रधानांना बोलायला सांगितलं असतं त्यांनीही विचार केला असता, असे अमित शाह म्हणाले. तुम्हाला कशा प्रकारची लोकशाही व्यवस्था हवी आहे, असा सवालही त्यांनी विचारला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस