शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगे नेहरू, इंदिराजी आणि राजीव गांधींच्या काळात झाले, अमित शाहांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 20:40 IST

No Confidence motion : देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात भाषण करताना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती लोकसभेत दिली. यावेळी अमित शाह यांनी मणिपूर आणि ईशान्य भारतामधील वांशिक दंगलींचा इतिहास मांडतानाच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच देशात जर कुणाच्या काळात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली झाल्या असतील तर त्या जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या काळात झाल्या, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू झाल्यावर अमित शाह म्हणाले की, आता मी विरोधकांनी जी काही राजकीय विधानं केली त्याबाबत बोलणार आहे. मी अध्यक्षांच्या माध्यमातून गौरव गोगोई यांना सांगू इच्छितो की, तसेच आकडेवारीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, या देशात सर्वाधिक धार्मिक आणि वांशिक दंगली ह्या जवाहरलाल नेहरू, इंजिरा गांधी आणि, राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाले आहेत, असा दावा केला. तसेच यासाठी विविध दंगलीतील आकडेवारीही सभागृहासमोर मांडली.

ते पुढे म्हणाले की, मी एवढंच सांगू इच्छितो की, दंगली ह्या प्रत्येक काळात झाल्या आहेत. मात्र आम्ही कधी दंगलींना पक्षांसोबत जोडलं नाही. आम्ही कधी दंगलींबाबतचं उत्तर देताना कुठल्या गृहमंत्र्यांना रोखलेलं नाही. आम्ही कधी पंधरा पंधरा दिवस सभागृहाला वेठीस धरलेलं नाही. आम्ही विरोधात असतानाही शांतीचं आवाहन केलं आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत माहिती देताना अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार नाही, असा भ्रम पसरवला गेला. मात्र मी या सभागृहासमोर स्पष्ट करू इच्छितो की, सभागृहाची सुरुवात होण्यापूर्वीपासून मी चर्चा करण्यास तयार असल्याचे अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं होतं. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, मी मणिपूरवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधकांना चर्चा करायची नव्हती. दर माझ्या उत्तरानं समाधान झालं नसतं तर पंतप्रधानांना बोलायला सांगितलं असतं त्यांनीही विचार केला असता, असे अमित शाह म्हणाले. तुम्हाला कशा प्रकारची लोकशाही व्यवस्था हवी आहे, असा सवालही त्यांनी विचारला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNo Confidence motionअविश्वास ठरावBJPभाजपाcongressकाँग्रेस