शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 14:09 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० शेतकरी बेपत्तादिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारमोगा जिल्ह्यातील ११ जण तिहार कारागृहात असल्याचा दावा

चंदीगड : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाल किल्ला आणि दिल्लीतील विविध भागात झालेल्या आंदोलनात या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात बहुतांश तरुण असल्याचे सांगितले जात आहे. यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पंजाबमधील विविध शेतकरी आणि धार्मिक संघटनांनी आरोप केला आहे की, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर ४०० शेतकरी आणि तरुण मंडळी बेपत्ता झाली आहेत. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सर्वांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवले आहे, असा दावा अमृतसर येथील खालडा मिशन यांनी केला आहे. या प्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात आला आहे. 

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका 

कोणत्याही ठोस कारणांशिवाय पोलीस अधिक कालावधीपर्यंत ताब्यात ठेवू शकत नाही. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, असे पंजाबमधील मानवाधिकार संघटनेचे तपास अधिकारी सरबजीत सिंग वेरका यांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास वकील सरसावले

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील काही वकीलही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सरसावले आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि तरुण मंडळी अद्यापही संबंधित शिबिरात परत आलेली नाहीत. वकिलांचे एक पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती वकील हाकम सिंग यांनी दिली. 

मोगाचे ११ जण तिहार कारागृहात!

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी मोगा जिल्ह्यातील ११ तरुण तिहार कारागृहात आहेत. नांगलोई पोलिसांनी त्यांना अटक केली होती, असा दावा दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनPunjabपंजाब