शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 14:09 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० शेतकरी बेपत्तादिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारमोगा जिल्ह्यातील ११ जण तिहार कारागृहात असल्याचा दावा

चंदीगड : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाल किल्ला आणि दिल्लीतील विविध भागात झालेल्या आंदोलनात या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात बहुतांश तरुण असल्याचे सांगितले जात आहे. यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पंजाबमधील विविध शेतकरी आणि धार्मिक संघटनांनी आरोप केला आहे की, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर ४०० शेतकरी आणि तरुण मंडळी बेपत्ता झाली आहेत. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सर्वांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवले आहे, असा दावा अमृतसर येथील खालडा मिशन यांनी केला आहे. या प्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात आला आहे. 

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका 

कोणत्याही ठोस कारणांशिवाय पोलीस अधिक कालावधीपर्यंत ताब्यात ठेवू शकत नाही. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, असे पंजाबमधील मानवाधिकार संघटनेचे तपास अधिकारी सरबजीत सिंग वेरका यांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास वकील सरसावले

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील काही वकीलही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सरसावले आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि तरुण मंडळी अद्यापही संबंधित शिबिरात परत आलेली नाहीत. वकिलांचे एक पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती वकील हाकम सिंग यांनी दिली. 

मोगाचे ११ जण तिहार कारागृहात!

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी मोगा जिल्ह्यातील ११ तरुण तिहार कारागृहात आहेत. नांगलोई पोलिसांनी त्यांना अटक केली होती, असा दावा दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनPunjabपंजाब