शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

धक्कादायक! दिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० पेक्षा अधिक शेतकरी बेपत्ता; पोलिसांवर संशय

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 14:09 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील हिंसाचारानंतर ४०० शेतकरी बेपत्तादिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारमोगा जिल्ह्यातील ११ जण तिहार कारागृहात असल्याचा दावा

चंदीगड : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारानंतर तब्बल ४०० हून अधिक शेतकरी बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लाल किल्ला आणि दिल्लीतील विविध भागात झालेल्या आंदोलनात या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात बहुतांश तरुण असल्याचे सांगितले जात आहे. यामागे दिल्ली पोलिसांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

पंजाबमधील विविध शेतकरी आणि धार्मिक संघटनांनी आरोप केला आहे की, दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर ४०० शेतकरी आणि तरुण मंडळी बेपत्ता झाली आहेत. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्या सर्वांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवले आहे, असा दावा अमृतसर येथील खालडा मिशन यांनी केला आहे. या प्रकरणी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय संघटनांकडून घेण्यात आला आहे. 

'राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्याला अटक करा', राकेश टिकैत यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दिल्ली उच्च न्यायालयात याचिका 

कोणत्याही ठोस कारणांशिवाय पोलीस अधिक कालावधीपर्यंत ताब्यात ठेवू शकत नाही. दिल्ली पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांविषयी माहिती देणे आवश्यक आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेची संपूर्ण तयारी झाली आहे, असे पंजाबमधील मानवाधिकार संघटनेचे तपास अधिकारी सरबजीत सिंग वेरका यांनी सांगितले.

बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास वकील सरसावले

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील काही वकीलही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यास सरसावले आहेत. दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि तरुण मंडळी अद्यापही संबंधित शिबिरात परत आलेली नाहीत. वकिलांचे एक पथक बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती वकील हाकम सिंग यांनी दिली. 

मोगाचे ११ जण तिहार कारागृहात!

दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर बेपत्ता झालेल्यांपैकी मोगा जिल्ह्यातील ११ तरुण तिहार कारागृहात आहेत. नांगलोई पोलिसांनी त्यांना अटक केली होती, असा दावा दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीagitationआंदोलनPunjabपंजाब