शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशभरात उष्णतेची लाट सुरू असताना आली 'सुखद वार्ता' ; मॉन्सूनची १० दिवसांनंतर जोरात आगेकूच सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 20:04 IST

पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण; राज्यात उष्णतेचा कहर सुरुच

ठळक मुद्देपश्चिम राजस्थानमधील चुरू येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमान; ५० अंश सेल्सिअस नोंदविदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम३० मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले १० दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली आहे. मॉन्सूनने बुधवारी बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला असल्याने हवामान विभागाने जाहीर केले आहे. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्वअरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मेरोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखीथोडा पुढे सरकला होता. त्यानंतर २७ मे रोजी त्याने पुढे वाटचाल सुरु केलीआहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.४ अंश सेल्सिअस तर,सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.६ अंश सेल्सिअस नोंदविलेगेले आहे. देशात पश्चिम राजस्थानात काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आली आहे. हरियाणा, दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आहे. उत्तर मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान,मराठवाडा व सौराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमान ५० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या व मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली आहे.२८ व २९ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ३० मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

इशारा : २८ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. २९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. ३० मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. ३१ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे........२८ मे रोजी जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.३१ मे रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामानRainपाऊस