शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

देशभरात उष्णतेची लाट सुरू असताना आली 'सुखद वार्ता' ; मॉन्सूनची १० दिवसांनंतर जोरात आगेकूच सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 20:04 IST

पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण; राज्यात उष्णतेचा कहर सुरुच

ठळक मुद्देपश्चिम राजस्थानमधील चुरू येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमान; ५० अंश सेल्सिअस नोंदविदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम३० मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले १० दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली आहे. मॉन्सूनने बुधवारी बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रातील बहुतांश भाग, अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला असल्याने हवामान विभागाने जाहीर केले आहे. मालदीव कॉमोरिन भाग आणि लगतच्या दक्षिण पूर्वअरबी समुद्र, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग आणि दक्षिण व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये पुढील ४८ तासांत आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मेरोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखीथोडा पुढे सरकला होता. त्यानंतर २७ मे रोजी त्याने पुढे वाटचाल सुरु केलीआहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६.४ अंश सेल्सिअस तर,सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.६ अंश सेल्सिअस नोंदविलेगेले आहे. देशात पश्चिम राजस्थानात काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आली आहे. हरियाणा, दिल्ली आणि पूर्व उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट आहे. उत्तर मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान,मराठवाडा व सौराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे जगातील सर्वाधिक कमाल तापमान ५० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या व मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय वाढ झाली आहे.२८ व २९ मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ३० मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

इशारा : २८ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. २९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. ३० मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. ३१ मे रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे........२८ मे रोजी जळगाव, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.३१ मे रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत तुरळकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामानRainपाऊस