Mohan Bhagwat on Bangladesh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातीलहिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, बांगलादेशातहिंदू अल्पसंख्याक आहेत आणि तेथील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभे राहणे अत्यावश्यक आहे.
हिंदूंकरिता भारत एकमेव देश
भागवत पुढे म्हणतात, बांगलादेशातील हिंदूंना मदतीची गरज आहे. जगभरातील हिंदूंनी आपल्या परीने त्यांना मदत केली पाहिजे. आम्ही भारताच्या सीमांच्या आत राहून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अलीकडेच एका हिंदू युवकाला भररस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडल्याचे उदाहरण देत, परिस्थिती किती गंभीर आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, हिंदूंकरिता भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत सरकारने या विषयाची दखल घेणे गरजेचे आहे. सरकार काही करत असेलही, पण काही गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. कधी प्रयत्नांना यश येते, कधी येत नाही, पण काही ना काही करणे आवश्यक आहे.
भारत हिंदूराष्ट्रच आहे...
जर हिंदू समाज एकजुटीने उभा राहिला, तर बंगालमधील परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. मात्र, राजकीय बदलांबाबत विचार करणे हे आपले काम नसून, संघ सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलताना भागवत म्हणाले, सूर्य पूर्वेला उगवतो, त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. त्याचप्रमाणे हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे. जो भारताला आपली मातृभूमी मानतो आणि भारतीय संस्कृतीचा सन्मान करतो, तो या राष्ट्राचा भाग आहे. संविधानात ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द असो वा नसो, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही हिंदू आहोत आणि आमचे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, हेच सत्य आहे. जन्मावर आधारित जातिव्यवस्था ही हिंदुत्वाची ओळख नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
RSS मुस्लिमविरोधी नाही
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, एक वाद होता, तो न्यायालयात गेला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधले गेले आणि वाद संपला. मात्र, पुन्हा बाबरी मशीद उभारून तो वाद जाणीवपूर्वक पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न हा राजकीय कट आहे आणि तो केवळ मतांसाठी केला जात आहे. अशा प्रयत्नांचा ना हिंदूंना फायदा होणार आहे, ना मुसलमानांना. संघावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप फेटाळून लावताना भागवत म्हणाले, RSS चे काम पूर्णपणे पारदर्शक आहे. कोणीही येऊन प्रत्यक्ष पाहू शकतो. आम्ही हिंदूंना संघटित करतो, हिंदू समाजाच्या संरक्षणाची भाषा करतो, पण आम्ही मुस्लिमविरोधी नाही.
Web Summary : Mohan Bhagwat voiced concern over atrocities against Bangladeshi Hindus, urging unity for safety. He emphasized India as Hindus' only nation, advocating for their support. Bhagwat clarified RSS isn't anti-Muslim and India is a Hindu nation culturally.
Web Summary : मोहन भागवत ने बांग्लादेशी हिंदुओं पर अत्याचारों पर चिंता व्यक्त की, सुरक्षा के लिए एकता का आग्रह किया। उन्होंने भारत को हिंदुओं का एकमात्र राष्ट्र बताते हुए उनके समर्थन की वकालत की। भागवत ने स्पष्ट किया कि आरएसएस मुस्लिम विरोधी नहीं है और भारत सांस्कृतिक रूप से एक हिंदू राष्ट्र है।