शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोदी यांची मानसिकता दलितविरोधी- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 04:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता दलितविरोधी आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता दलितविरोधी आहे. त्यांच्या मनात दलितांविषयी जराही कणव नाही, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी करताच भाजपा अध्यक्ष अमित शहा त्यांच्यावर तुटून पडले. हे करताना त्यांनी राहुल यांचे दिवंगत पिता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाही सोडले नाही.सर्वोच्च न्यायालयाने दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) मुळमुळीत केला तरी सरकार काही करत नाही, याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. तेथे मोदींवर तोफ डागताना राहुल म्हणाले, मोदींची मानसिकता दलितविरोधी आहे. त्यांच्या मनात दलितांविषयी जराही कणव नाही व त्यांना दलितांना चिरडून टाकायचे आहे, हे दलित व शोषित समाज जाणून आहे. म्हणूनच आम्ही (काँग्रेस) त्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहोत. राहुल असेही म्हणाले, मोदींना हवा तसा भारत आम्ही होऊ देणार नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्य यासह सर्वांना स्थान असेल, सर्वांना प्रगतीची संधी मिळेल, असा भारत आम्हाला हवा आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा काँग्रेसने केला होता. तो जपण्यासाठी काँग्रेस इतरांना सोबत घेऊन लढा देईल.राहुल गांधी यांच्या या टीकेचा भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी लगेच टिष्ट्वटरवर खरपूस समाचार घेतला. शहा यांनी टिष्ट्वटमध्ये लिहिले की, राहुल गांधींकडून अभ्यास करून बोलण्याची आणि प्रामाणिकपणाची अपेक्षाही केली जाऊ शकत नाही. आता त्यांना दलितांच्या कल्याणाचा पुळका आला आहे. पण त्यांचे वडील व माजी काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी मंडल आयोगास कडाडून विरोध करणारी भाषणे दिली, ती त्यांनी जरूर वाचावीत. त्यातून दलितांविषयीचा द्वेष त्यांना दिसून येईल.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाबू जगजीवनराम व सीताराम केसरी या दलित नेत्यांना काँग्रेसने जी (वाईट) वागणूक दिली त्याविषयीही काँग्रेस अध्यक्षांनी तोंड उघडले असते तर बरे झाले असते. काँग्रेसने वर्षानुवर्षे दलितांची अस्मिता अपमानित केली. काँग्रेसने दलितांना उपकृत केल्याच्या भावनेने वागविले, असेही अमित शहा यांनी म्हटले.>अ‍ॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती राज्यसभेतही मंजूरसर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निष्प्रभ करून ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा’ पूर्ववत करण्याच्या सुधारणा विधेयकास राज्यसभेनेही गुरुवारी मंजुरी दिली. लोकसभेने हे सुधारणा विधेयक याआधीच मंजूर केले आहे. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यावर हा सुधारित कायदा अंमलात येईल. त्यानुसार अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याआधी तक्रारीच्या खरेपणाची प्राथमिक शहानिशा करावी लागणार नाही, आरोपीस अटक करण्यापूर्वी तपासी अधिकाऱ्याने वरिष्ठाची मंजुरी घेणे गरजेचे असणार नाही व आरोपीस अटकपूर्व जामीनही मिळणार नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह