शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

मोदींकडून गरिब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन, स्थलांतरीतांना नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:00 AM

कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात वर्षाला २ कोटी रोजगार उपलब्ध करणार असल्याची घोषणा निवडणुकींच्या प्रचारसभांमध्ये केली होती. मात्र, घोषणेप्रमाणे देशात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला नसल्याची टीका विरोधी पक्षांनी सातत्याने मोदी सरकारवर केली आहे. विरोधकांच्या या टीकेला सरकारने, ईपीएफची आकडेवारी जाहीर करत रोजगारनिर्मित्ती झाल्याचं अनेकदा सांगितलं आहे. मात्र, आता गरिब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 20 जून रोजी या योजनेचं उद्घाटन होणार आहे. 

कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. यावरती खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचे अनेक तज्‍ज्ञांनी सांगितले. या अपरिहार्यतेमुळे केंद्र शासनाला देशात लॉकडाऊन जाहीर करावे लागला. रुग्ण संख्या वाढतच असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने देखील आग्रही भूमिका घेत लॉकडाऊन वेळोवेळी वाढविले. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका उद्योग व कामगार वर्गाला बसला असून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर युवकांना नोकरीच्या नव्या संधी शोधण्याचं आवाहन करण्यात ये आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 20 जून रोजी गरिब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात होणार आहे. 

ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम देण्याचं लक्ष्य ठेऊन पंतप्रधान मोदींकडून 20 जून रोजी गरिब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे या योजनेचं उद्घाटन होणार आहे. बिहारच्या खागरिया जिल्ह्यातील तेलीहार या खेड्यातून या योजनेला सुरुवात होईल. सुरुवातीला, देशाच्या 6  राज्यातील 116 जिल्ह्यांतील गावांमध्ये ही योजनेच्या माध्यमातून रोजगारनिर्मित्ती होईल.  या योजनेतून 25 विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतील. तर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यातील स्थलांतरीत नागरिकांना रोजगार देण्याचं काम प्राथमिक स्तरावर होणार आहे. त्यामध्ये जवळपास 25 हजार स्थलांतरीतांन काम मिळेल. पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेशMigrationस्थलांतरण