शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची तीन वर्षांची डेडलाईन

By admin | Updated: August 20, 2014 18:36 IST

गंगा नदी आगामी तीन वर्षात स्वच्छ करु अशी ग्वाही केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दिली असून सहा महिन्यांत या मोहीमेला सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० - गंगा नदी आगामी तीन वर्षात स्वच्छ करु अशी ग्वाही केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दिली असून गंगा नदीत औद्योगिक कंपन्यांकडून सोडल्या जाणा-या प्रदुषित सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उमा भारतींनी म्हटले आहे. 
बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. गंगेतील पाणी हे प्राण्यांसाठीही उपयुक्त राहिलेले नाही हे दुर्दैवच आहे अशा शब्दात त्यांनी गंगा नदीतील प्रदषणावर नाराजी व्यक्त केली. गंगा स्वच्छता अभियान सहा महिन्यांत सुरु होईल. तीन वर्षांत गंगेचे पाणी प्रदुषणमुक्त असेल असे आश्वासन त्यांनी दिले. गंगेत कारखान्यांमधून सोडल्या जाणा-या सांडपाण्यासाठी इन्वायरमेंट फ्लो ही योजना राबवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 
यमूना नदीतील प्रदुषणाच्या समस्येवर कायमस्वरुप तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारला आमच्या मंत्रालयातर्फे सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल असे त्यांनी नमूद केले.  
नदी जोड प्रकल्प राबवताना पर्यावरणाची हानी आणि नदीतील जीवजंतूंना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तसेच लोप पावलेल्या नद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवू असेही उमा भारती यांनी सांगितले.