शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:31 IST

भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत आता आसामधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या काळात मुस्लिमांसोबत मानवतेने वागवले जात नाही आहे. त्यांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांना भारतीय नागरिक मानले जात नाही आहे, असा आरोप बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.बदरुद्दीन अजमल हे आसाममधील खासदार असून, ते एआययूडीएचे प्रमुख आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनावर अजमल यांनी गंभीर टीका केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेल्या दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, ''तुम्ही उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागात सीएए विरोधात झालेल्य आंदोलनाच्या घटना पाहा. पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जातो. मात्र नंतर त्यांची कसलीही चौकशी होत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले जाते. असे कौतुक करतानाचे भाजपा नेत्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.जे अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. भाजपाने देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्यातरी देश त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उद्या देशाची सूत्रे अन्य कुणाच्या तरी ताब्यात असतील.''''भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ''केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकून घेऊ इच्छित नाही. आपल्याकडे बहुमत आहे त्यामुळे आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र हा केवळ भ्रम आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि नागरिकत्व कायदा लागू करून लोकांनी घुसखोर ठरवू, असे त्यांना वाटते. मात्र हे सर्व काही फार काळ चालणार नाही, असा टोलाही अजमल यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस त्यांनीच विणलेल्या जाळ्यात फसतील, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAssamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण