शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मोदी सरकारकडून मुस्लिमांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे; खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:31 IST

भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत आता आसामधील खासदार बदरुद्दीन अजमल यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपा सरकारच्या काळात मुस्लिमांसोबत मानवतेने वागवले जात नाही आहे. त्यांना किड्या मुंग्यांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुस्लिमांना भारतीय नागरिक मानले जात नाही आहे, असा आरोप बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.बदरुद्दीन अजमल हे आसाममधील खासदार असून, ते एआययूडीएचे प्रमुख आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दृष्टीकोनावर अजमल यांनी गंभीर टीका केली आहे. मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेल्या दुजाभावाबद्दल ते म्हणाले की, ''तुम्ही उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागात सीएए विरोधात झालेल्य आंदोलनाच्या घटना पाहा. पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला जातो. मात्र नंतर त्यांची कसलीही चौकशी होत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले जाते. असे कौतुक करतानाचे भाजपा नेत्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.जे अत्यंत लाजिरवाणे आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. भाजपाने देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्यातरी देश त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उद्या देशाची सूत्रे अन्य कुणाच्या तरी ताब्यात असतील.''''भाजपाने आपल्या धोरणांनुसार सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचे हे धोरण फार काळ चालेल, असे मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरूनही त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. ''केंद्रातील भाजपा आणि मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज ऐकून घेऊ इच्छित नाही. आपल्याकडे बहुमत आहे त्यामुळे आपण काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र हा केवळ भ्रम आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि नागरिकत्व कायदा लागू करून लोकांनी घुसखोर ठरवू, असे त्यांना वाटते. मात्र हे सर्व काही फार काळ चालणार नाही, असा टोलाही अजमल यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवस त्यांनीच विणलेल्या जाळ्यात फसतील, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :IndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAssamआसामcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण