शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वायनाडमध्ये चमत्कार! भूस्खलनाच्या चौथ्या दिवशी चारजण जिवंत सापडले, आतापर्यंत ३०८ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:05 IST

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत.

केरळच्या वायनाडमध्ये ३० जुलैच्या पहाटे भला मोठा डोंगर चार गावांवर कोसळला होता. या घटनेला आज चार दिवस होत आलेत. तो चिखल, पाणी आणि दरड पाहून आता कोणी जिवंत सापडेल अशी आशा वाटत नव्हती. रेस्क्यू ऑपरेशन तरीही सुरुच होते. बघता बघता मृतदेहांच्या आकड्याने ३०० चा आकडा पार केला. अद्यापही अनेक लोक या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत किंवा पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले आहेत. असे असताना एक चमत्कार घडला आहे. 

वायनाडमध्ये बचाव कार्य करत असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीला मातीच्या ढिगाऱ्याखालून चार जण जिवंत सापडले आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरूष आहेत. लँडस्लाईडनंतर ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. पदावेट्टी कुन्नू गावातून त्यांना वाचविण्यात आले आहे. यामुळे रेस्क्यू टीमच्या आशा पल्लवीत झाल्या असून आणखी काही जण जिवंत सापडतील या आशेने कामाचा वेग वाढविण्यात येत आहे. 

आतापर्यंत ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९५ जणांचेच मृतदेह सापडले असून उर्वरित व्यक्तींचा शरीराचा कोणता ना कोणता भाग सापडला आहे. या १०५ लोकांच्या शरीराचा काही भाग रेस्क्यू टीमला सापडला आहे. यावरून त्यांचा मृत्यू झाल्याचे ठरविण्यात आले आहे. 

भारतीय सैन्य, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, एसडीआरएफसह ४० टीम या रेस्क्यू ऑपरेशनसाठी काम करत आहेत. हा भाग मोठा असल्याने सहा भागात त्याची वाटणी केली जाणार आहे. जेणेकरून ज्या भागात आतापर्यंत पोहोचता आले नाही, तिथे लवकर मदत मिळाली तर आणखी काही लोक जिवंत सापडू शकतील अशी आशा आहे. तसेच हिंडन एअरबेसवरून सी-130 विमानातून ड्रोनद्वारे मातीखाली गाडले गेलेल्या लोकांना शोधण्यात येणार आहे. याचीही तयारी हिंडनमध्ये सुरु झाली आहे. 

भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत. यामुळे या भागात हेलिकॉप्टरही सर्च ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आली आहेत. वन विभागाचे कर्मचारीही बोलावण्यात आले आहेत. 

टॅग्स :landslidesभूस्खलनKeralaकेरळ