शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

काय सांगता? मृत्यूनंतर 19 तासांनी मुलगा पुन्हा श्वास घेऊ लागला अन् चमत्कार झाला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 09:23 IST

Boy starts breathing after 19 hours of death : मृत्यूनंतर 19 तासांनी मुलाच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली आहे. तीन दिवस उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी दुपारी 3 वाजता एका अल्पवयीन मुलाला मृत घोषित केलं. मात्र मृत्यूनंतर 19 तासांनी पुन्हा मुलगा श्वास घेऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर मंगळवारी सकाळी 10 वाजता त्याचे कुटुंबीय मृतदेह घेऊन आपल्या घरी पोहोचले. तर मृत्यूनंतर 19 तासांनी त्याच्या शरीरामध्ये पुन्हा काही हालचाली जाणवू लागल्या. यानंतर तात्काळ त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

मुलावर 4 तास उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली होती. मानधाताच्या डिहवा गावातील 17 वर्षीय कमलेश मौर्य याची तब्येत खराब झाली होती. याच कारणामुळे तीन दिवसाआधी कुटुंबीय त्याला प्रयागराज येथे घेऊन गेले आणि त्याला एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी दुपारी डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केलं. रुग्णालयाचं बिल भरायला उशीर झाल्यामुळे रात्री हे सर्व तिथेच थांबले. मंगळवारी सकाळी 10 वाजता कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले तेव्हा त्याला मिठी मारू लागले.

कमलेशच्या शरीरात याच दरम्यान अचानक काही हालचाली जाणवू लागल्या. हे पाहून कुटुंबीयदेखील हैराण झाले. तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याची नाडी तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबीया तात्काळ कमलेशला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे भरती केल्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. चार तास कमलेश श्वास घेत होता मात्र दुपारी दोनच्या सुमारास त्याचा श्वास थांबला. यानंतर कुटुंबीय त्याचा मृतदेह घेऊन घरी परतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून 'त्याने' टोकाचं पाऊल उचललं, आत्महत्या करून जीवन संपवलं 

 बिहारमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. पुलावरून कालव्यात उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांना जेव्हा या भयंकर घटनेची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी कालव्यामध्ये मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. तब्बल 12 तासांनंतर अनेक समस्यांचा सामना केल्यावर सोमवारी सकाळी डलमियानगर परिसराजवळीन कालव्यामध्ये मृतदेह सापडला. तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर