शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
4
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
5
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
6
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
7
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
8
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
9
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
10
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
11
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
12
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
13
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
14
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
15
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
16
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
17
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
18
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
19
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
20
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.
मनुष्याने कोणतेही साधन करताना तत्पर असावे. परमतत्त्वापर्यंत जावयाचे असल्यास ज्ञान नावाच्या साधनामध्ये तत्पर असावे लागते. कारण अध्यात्मज्ञानाशिवाय परमात्मवस्तू प्राप्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तरी परमात्मा ऐसे।
जे एक वस्तु असे।
ते जया दिसे। ज्ञानास्तव।।
हे ज्ञान प्राप्त करण्याकरिताही चार गोष्टींची गरज आहे. विवेक, वैराग्य, शमदमारीषट्कसंपत्ती व मुमुक्षुता. संत तुकाराम महाराज म्हणतात,
फलकर तो संसार।
येश सार भगवंत।।
असा जो विचार आहे त्यालाच विवेक असे म्हणतात. माणसाने काही गोष्टींचा कधीच विचार करू नये व काही गोष्टींचा नेहमी विचार करावा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
'मी'चा विचार करणे यालाच विवेक म्हणतात. प्रापंचिक भोगाविषयी जी त्यागबुद्धी निर्माण झालेली असते, तिला वैराग्य म्हणतात. तसेच इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आदी करून ज्या गोष्टी त्यांना शमदमारीषट्कसंपत्ती म्हणतात व अंत:करणात असलेली तीव्र जिज्ञासा तिला मुमुक्षुता म्हणतात. या चार गोष्टींमध्ये असलेली तत्परता म्हणजेच ज्ञानामार्गाची तत्परता होय.
अष्टांग योगाचाही विचार योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी मांडलेला आहेच. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी आठ अंगे आहेत. यामध्येही तत्पर असणे त्यासच योगामार्गातील तत्परता असे म्हटले जाते.
याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी, एक मैत्रेयी व दुसरी कात्यायनी. मुनींनी सर्व संपत्ती दोघींना देऊन अरण्यात निघाल्यावर कात्यायनीने त्या संपत्तीचा स्वीकार केला; परंतु मैत्रेयीने त्या संपत्तीचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर अरण्यात निघून गेली. यामध्ये कात्यायनीचे जे रूप ते भोगरूप, मैत्रेयीचे जे रूप ते त्यागरूप व याज्ञवल्क्यांचे जे रूप ते योगरूप होय. याचा अर्थ असा आहे की, ज्ञानप्राप्तीमध्ये येणार्‍या अनेक प्रतिबंधाचा त्याग करणे हीच खरी ज्ञानयोग व्यवस्थिती होय.