शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.
मनुष्याने कोणतेही साधन करताना तत्पर असावे. परमतत्त्वापर्यंत जावयाचे असल्यास ज्ञान नावाच्या साधनामध्ये तत्पर असावे लागते. कारण अध्यात्मज्ञानाशिवाय परमात्मवस्तू प्राप्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तरी परमात्मा ऐसे।
जे एक वस्तु असे।
ते जया दिसे। ज्ञानास्तव।।
हे ज्ञान प्राप्त करण्याकरिताही चार गोष्टींची गरज आहे. विवेक, वैराग्य, शमदमारीषट्कसंपत्ती व मुमुक्षुता. संत तुकाराम महाराज म्हणतात,
फलकर तो संसार।
येश सार भगवंत।।
असा जो विचार आहे त्यालाच विवेक असे म्हणतात. माणसाने काही गोष्टींचा कधीच विचार करू नये व काही गोष्टींचा नेहमी विचार करावा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
'मी'चा विचार करणे यालाच विवेक म्हणतात. प्रापंचिक भोगाविषयी जी त्यागबुद्धी निर्माण झालेली असते, तिला वैराग्य म्हणतात. तसेच इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आदी करून ज्या गोष्टी त्यांना शमदमारीषट्कसंपत्ती म्हणतात व अंत:करणात असलेली तीव्र जिज्ञासा तिला मुमुक्षुता म्हणतात. या चार गोष्टींमध्ये असलेली तत्परता म्हणजेच ज्ञानामार्गाची तत्परता होय.
अष्टांग योगाचाही विचार योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी मांडलेला आहेच. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी आठ अंगे आहेत. यामध्येही तत्पर असणे त्यासच योगामार्गातील तत्परता असे म्हटले जाते.
याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी, एक मैत्रेयी व दुसरी कात्यायनी. मुनींनी सर्व संपत्ती दोघींना देऊन अरण्यात निघाल्यावर कात्यायनीने त्या संपत्तीचा स्वीकार केला; परंतु मैत्रेयीने त्या संपत्तीचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर अरण्यात निघून गेली. यामध्ये कात्यायनीचे जे रूप ते भोगरूप, मैत्रेयीचे जे रूप ते त्यागरूप व याज्ञवल्क्यांचे जे रूप ते योगरूप होय. याचा अर्थ असा आहे की, ज्ञानप्राप्तीमध्ये येणार्‍या अनेक प्रतिबंधाचा त्याग करणे हीच खरी ज्ञानयोग व्यवस्थिती होय.