शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

मनाचिये गुंथी - ॲड. जयवंत ज्ञानयोग व्यवस्थिती

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.

ज्ञानेश्वरीमधील दैवी संपत्तीचा विचार करीत असता, अभय, सत्त्वशुद्धी यानंतर ज्ञानयोग व्यवस्थिती असा तिसरा सद्गुण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञान व अष्टांगयोग हे मार्ग सांगितले आहेत. त्यामध्ये कोणत्याही एका मार्गावर आपण स्थिर असणे तसेच त्या मार्गात तत्पर असणे यास ज्ञानयोग व्यवस्थिती असे म्हणतात.
मनुष्याने कोणतेही साधन करताना तत्पर असावे. परमतत्त्वापर्यंत जावयाचे असल्यास ज्ञान नावाच्या साधनामध्ये तत्पर असावे लागते. कारण अध्यात्मज्ञानाशिवाय परमात्मवस्तू प्राप्त होणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
तरी परमात्मा ऐसे।
जे एक वस्तु असे।
ते जया दिसे। ज्ञानास्तव।।
हे ज्ञान प्राप्त करण्याकरिताही चार गोष्टींची गरज आहे. विवेक, वैराग्य, शमदमारीषट्कसंपत्ती व मुमुक्षुता. संत तुकाराम महाराज म्हणतात,
फलकर तो संसार।
येश सार भगवंत।।
असा जो विचार आहे त्यालाच विवेक असे म्हणतात. माणसाने काही गोष्टींचा कधीच विचार करू नये व काही गोष्टींचा नेहमी विचार करावा. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

मी कोण ऐसा करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा।।
'मी'चा विचार करणे यालाच विवेक म्हणतात. प्रापंचिक भोगाविषयी जी त्यागबुद्धी निर्माण झालेली असते, तिला वैराग्य म्हणतात. तसेच इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आदी करून ज्या गोष्टी त्यांना शमदमारीषट्कसंपत्ती म्हणतात व अंत:करणात असलेली तीव्र जिज्ञासा तिला मुमुक्षुता म्हणतात. या चार गोष्टींमध्ये असलेली तत्परता म्हणजेच ज्ञानामार्गाची तत्परता होय.
अष्टांग योगाचाही विचार योगसूत्रामध्ये पतंजली मुनींनी मांडलेला आहेच. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अशी आठ अंगे आहेत. यामध्येही तत्पर असणे त्यासच योगामार्गातील तत्परता असे म्हटले जाते.
याज्ञवल्क्य ऋषींना दोन पत्नी, एक मैत्रेयी व दुसरी कात्यायनी. मुनींनी सर्व संपत्ती दोघींना देऊन अरण्यात निघाल्यावर कात्यायनीने त्या संपत्तीचा स्वीकार केला; परंतु मैत्रेयीने त्या संपत्तीचा त्याग करून ती आपल्या पतीबरोबर अरण्यात निघून गेली. यामध्ये कात्यायनीचे जे रूप ते भोगरूप, मैत्रेयीचे जे रूप ते त्यागरूप व याज्ञवल्क्यांचे जे रूप ते योगरूप होय. याचा अर्थ असा आहे की, ज्ञानप्राप्तीमध्ये येणार्‍या अनेक प्रतिबंधाचा त्याग करणे हीच खरी ज्ञानयोग व्यवस्थिती होय.