शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दुधाचे मोठे संकट : 'या' राज्यात 11 लाख गायी लम्पी आजाराने ग्रस्त; 4 लाख लिटर दुधाचे उत्पादन घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 16:21 IST

milk crisis : अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे. 

जयपूर : राजस्थानात जनावरांममध्ये पसरणाऱ्या लम्पी स्कीन रोगाने महामारीचे रूप धारण केले आहे. लम्पीमुळे राजस्थानमध्ये आतापर्यंत 57 हजार गायींचा मृत्यू झाला असून 11 लाख गायी आजारी आहेत. याचा थेट परिणाम राजस्थानातील दुधाच्या उत्पादनात झाला असून चार लाख लिटरने उत्पादनात घट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुधाची आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे राजस्थानमधील सर्वात मोठ्या डेअरी सरसने दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महाग केले आहे. तुपाचे उत्पादनही घटले आहे. 

जयपूरजवळील बरना गावातून दररोज 10 हजार लिटर दुधाचा पुरवठा होत होता. मात्र, लम्पी रोगामुळे केवळ सहा हजार लिटर दुधाचा पुरवठा होत आहे. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले आहे. त्यानुसार, बरना गावात दूध उत्पादक महेंद्र शर्मा यांचा गोठा आहे. त्यांच्या गोठ्यात  27 गायी आहेत, मात्र गेल्या काही दिवसांत 8 गायींचा लम्पी रोगाने मृत्यू झाला. पाच अजूनही लम्पीग्रस्त आहेत. महेंद्र यांनी गायींच्या उपचारासाठी अनेक फेऱ्या मारल्या, मात्र मदत मिळाली नाही. महेंद्र यांनी बँकेकडून कर्ज घेऊन या गायी खरेदी केल्या होत्या. एका गायीची किंमत जवळपास 70 हजार रुपये होती. गायींच्या मृत्यूनंतर महेंद्रला कर्जाचा हप्ता फेडणे कठीण झाले. लंपीमुळे दूधही कमी झाले आहे. महेंद्र आधी 150 लिटर दुधाचा पुरवठा करत होते, आता फक्त 75 लिटर दुधाचा पुरवठा करत आहेत.

या गावात 3 हजार गायी आहेत, मात्र 250 गायींचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर 500 गायी आजारी आहेत. ग्रामस्थ आपापल्या स्तरावर स्वदेशी उपचार करत आहेत. शासनाकडून उपचारासाठी विशेष व्यवस्था नाही. सरकार जनावरांना वाचवण्यासाठी काहीच करत नसल्याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. लम्पीच्या आराजाचा परिणाम असा झाला की, बरना गावातील मेम दूध डेअरीवर दूध देणाऱ्या शेतकऱ्यांच्या रांगा कमी झाल्या आणि दूध कमी झाले. या गावातून शेतकरी दररोज 10 हजार लिटर दूध डेअरीत विकत होते. लम्पीच्या कहरानंतर आता फक्त सहा हजार लिटर पुरवठा होत आहे. 

दुसरीकडे, भाजप नेते राजेंद्र राठोड यांनी आरोप केला की, लम्पीमध्ये गायींच्या मृत्यूची संख्या लाखोंच्या घरात आहे. गायींना वाचवण्यात आणि त्यांच्यावर उपचार करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याचबरोबर, राजस्थान सरकारमधील पर्यावरण मंत्री सुख राम विश्नोई यांनी स्पष्ट केले की, लम्पीपासून गायींना वाचवण्यासाठी औषधे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. घटत्या दूध उत्पादनातून दिलासा मिळावा म्हणून दूध उत्पादकांना सवलत दिली जात आहे, मात्र राजस्थान सरकारने लम्पीला साथीचा रोग म्हणून घोषित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. 

दरम्यान, गुजरातनंतर राजस्थान हे दूध उत्पादनात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दूध उत्पादनात राजस्थानचा वाटा 12.74  टक्के आहे. राजस्थानची अर्थव्यवस्थाही पशुधनावर अवलंबून आहे. जीडीपीच्या दहा टक्के पशुधनातून येतात. एका ढोबळ अंदाजानुसार, लम्पीमुळे जवळपास 600 कोटींचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :cowगायLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगmilkदूधMilk Supplyदूध पुरवठा