शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात परतलेल्या स्थलांतरित कुटुंबाचे अन्नधान्यासाठी हाल, पोट भरण्यासाठी विकावे लागले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:26 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

कन्नौज (उत्तर प्रदेश) - देशात झालेला कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर फरफट झाली आहे. हजारो मजुरांनी हजारो किलोमीटरचा पल्ला मिळेल त्या साधनाने वा पायी पार करत आपले मूळ गाव गाठले आहे. मात्र गावी गेल्यानंतरही अशा स्थलांतरितांची फरफट थांबण्याचे नाव घेत नाही आहे.उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या अशाच एका कुटुंबाकडे खाण्यासाठीसुद्धा काही नव्हते. त्यामुळे या कुटुंबाला धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी स्वतःकडचे दागिने नाईलाजास्तव विकावे लागल्याची घटना समोर आली आहे. हे कुटुंब सुमारे तीस वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने या कुटुंबाला मुळगावी परतावे लागले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कन्नौजमधील फतेहपूर जसोदा गावातील रहिवासी असलेले श्रीराम तीस वर्षांपूर्वी कुटुंबासह तामिळनाडूमध्ये गेले होते. तिथे कुल्फी विकून ते उदरनिर्वाह करत होते. तसेच ते पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घरमालकाने त्यांना घर खाली करण्यास बजावले त्यानंतर ते गावी परतले.मात्र गावी परतल्यानंतर त्यांचा पुढच्या फरफटीस सुरुवात झाली. याबाबत श्रीराम यांची कन्या राजकुमारी हिने सांगितले की, येथे आल्यावर आम्हाला १० किलो तांदूळ आणि डाळ देण्यात आली. आमचे कुटुंब मोठे आहे. त्यामुळे आमच्याकडील धान्य लवकर संपले. तर माझी भावंडे आणि आई आजारी पडली. त्यामुळे धान्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी आईकडील काही दागिने विकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. यादरम्यान आम्ही रेशनकार्ड बनवण्यासाठी प्रयत्न देखील केला. मात्र नवीन रेशनकार्ड बनत नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले.दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रशासन खडबडून जागे झाले. कन्नौजचे जिल्हाधिकारी राजेश मिश्रा यांनी याबाबत सांगितले की, मी ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी आणि सप्लाय इन्स्पेक्टर यांना याबाबतचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हे कुटुंब दोन आठवड्यांपूर्वी परतले होते. तसेच ट्रांझिस्ट कँम्पमध्ये राहत होते. त्यांची नोंदणी करून त्यांना धान्य देण्यात आले आहे. तसेच त्यांचे जॉब कार्ड बनवण्यात आले असून, त्यांचे रेशनकार्डही बनवण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत