शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

#MeToo: अकबर यांच्या राजीनाम्यामागची 'राज की बात'; जाणून घ्या कशी, का हलली सूत्रं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 7:35 PM

केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. किंबहुना, पदावरून पायउतार होण्याचे आदेश त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं.

नवी दिल्लीः पत्रकार, संपादक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या एम जे अकबर यांना 'मीटू' प्रकरण चांगलंच भोवलंय. अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानं संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अकबर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. किंबहुना, पदावरून पायउतार होण्याचे आदेश त्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गेल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. मोदी सरकारच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात, आरोप झाल्यानं राजीनामा द्यावा लागलेले अकबर हे पहिलेच मंत्री आहेत. 

पत्रकार प्रिया रमानी यांनी सर्वप्रथम एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर, आतापर्यंत 15 महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर शोषणाचे आरोप केलेत. हे आरोप झाले, तेव्हा अकबर परदेश दौऱ्यावर होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर, हा वैयक्तिक विषय असल्याचं सांगून भाजपानं सावध पवित्रा घेतला होता. रविवारी अकबर परदेश दौऱ्यावरून परतले. आपण राजीनामा देणार नाही, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं होतं. पण, ७२ तासांत सूत्रं हलली आणि अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं भाग पडलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी मंगळवारी अकबर यांची भेट घेतली होती, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळीच त्यांनी मोदींचा आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याचं निकटवर्तीयांनी सांगितलं. 

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्यात. अशावेळी, अकबर यांच्यावरील आरोपांमुळे सोशल मीडियावरून भाजपावर होणारी टीका पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी हे ठोस पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

एम जे अकबर हे मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेत. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होतेय. सोशल मीडियावर मंगळवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा स्त्री शक्ती या विषयावर मीडियाशी बोलत असतात आणि त्यांना अकबर यांच्याबाबतचा प्रश्न विचारताच ते निघून जातात, असा हा व्हिडीओ होता. त्यामुळे अकबर यांच्यावरील आरोपांचं प्रकरण आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं, याची जाणीव पक्षश्रेष्ठींना झाली. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसल्याचं त्यांना पटलं आणि अकबर यांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब झालं, असा घटनाक्रम सूत्रांनी सांगितला. भाजपा हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे, हा संदेश या निमित्तानं मोदींनी दिला आहे.  

दरम्यान, एम. जे. अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारपासून सुरू होतेय. रमानी यांच्या समर्थनार्थ 19 महिला पुढे आल्यात. या खटल्यात आपल्याला साक्ष देण्याची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 'रमानी या संघर्षात एकटी नाही. न्यायालयानं मानहानीच्या खटल्यात आमची साक्ष नोंदवावी. आमच्यातील काहीजणी लैंगिक अत्याचाराच्या साक्षीदार आहेत,' असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावर सर्व 19 महिलांची स्वाक्षरी आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मीनल बघेल, मनीषा पांडे, तुषिता पटेल, कणिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रमोला तलवार बादाम, होइहनु होजेल, आएशा खान, कुशलरानी गुलाब, कनीजा गजारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हामिदा पार्कर, जोनाली बुरागोहेन, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेवा, रेशमी चक्रवाती, किरण मनराल आणि संजरी चॅटर्जी यांचा समावेश आहे. याशिवाय डेक्कन क्रोनिकलच्या पत्रकार क्रिस्टिना फ्रान्सिस यांनीदेखील या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.  

टॅग्स :Metoo CampaignमीटूNarendra Modiनरेंद्र मोदीM J Akbarएम. जे. अकबर