शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:18 IST

भाजपाने देशभरात ३ सप्टेंबरपासून सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील सुमार कामगिरीने पक्ष नेतृत्व नाराज आहे. 

नवी दिल्ली - भाजपा सदस्यता अभियानात राज्य आणि नेत्यांकडून होणाऱ्या उदासीनतेमुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे. पहिल्या टप्प्यातील सदस्यता अभियान ३ सप्टेंबरला सुरू झालं होतं, ते २५ सप्टेंबरला संपले. भाजपाने या २३ दिवसांत जवळपास ६ कोटी सदस्य बनवले जे अपेक्षेपेक्षा खूप कमी आहेत. पक्षाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला २५ सप्टेंबरला १ कोटी नवीन सदस्य जोडण्याचं टार्गेट ठेवण्यात आले, मात्र ते पूर्ण झाले नाहीत. पक्षाच्या नेत्यांनी जोर लावूनही २५ सप्टेंबरपर्यंत ८३ लाख सदस्य बनवले, जे टार्गेटपेक्षा १७ लाखांनी कमी आहेत. 

सदस्यता अभियानात सुमार कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, बिहारसारख्या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील नेत्यांना सदस्यता अभियानात आकडे सुधारण्यास सांगितले आहे. बिहारमध्ये ३२ लाख, राजस्थानात २६ लाख सदस्य बनले आहेत तर तेलंगणात हा आकडा १० लाखांहून कमी आहे. या राज्यांनी सदस्य बनवण्यासाठी दिलेल्या टार्गेटमध्ये ५० टक्केही पूर्ण केले नाहीत. २५ सप्टेंबरला भाजपा सदस्यता अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ६ कोटी सदस्य आकड्यात केवळ ४ राज्यांत निम्म्याहून अधिक सदस्य बनले आहेत. 

टार्गेट अपूर्ण, नेतृत्व नाराज

यूपी, गुजरात, मध्य प्रदेश आणि आसाम या राज्यांनी ३ कोटीहून अधिक सदस्य बनवले आहेत. त्यात दीड कोटीहून अधिक सदस्य एकट्या उत्तर प्रदेशातून बनले आहेत. यूपीला २ कोटी सदस्य अभियानाचे टार्गेट होते. ज्यात त्यांनी ६५ टक्के यश मिळवले. दुसऱ्या नंबरवर गुजरात आणि मध्य प्रदेश आहे. या दोन्ही राज्यांनी मिळून १ कोटीहून अधिक सदस्य बनवले. गुजरात आणि मध्य प्रदेशने दिलेल्या टार्गेटच्या ७५ टक्के पूर्ण केलेत. तिसऱ्या क्रमांकावर आसाम असून त्याठिकाणी ५० लाखाहून अधिक सदस्य नोंदणी झाली आहे. आसामला ६५ लाख सदस्य नोंदणीचे टार्गेट दिले होते, दिलेल्या टार्गेटच्या ८५ टक्के आसामने पूर्ण केलेत.

छोट्या राज्यात सर्वात चांगली कामगिरी हिमाचल, अरुणाचल आणि त्रिपुरा यांची आहे. त्रिपुरा इथं १० लाखाहून अधिक सदस्य नोंदणी झाली. अरुणाचल प्रदेशात ६५ टक्के टार्गेट पूर्ण झालंय. हिमाचल प्रदेशात ७५ टक्के टार्गेट यशस्वी झाले आहे. उत्तराखंडमध्ये सदस्य नोंदणी अभियानात १० लाखांचा आकडा पार केला आहे. सदस्य नोंदणी अभियानात देशातील सर्व शहरांमध्ये दिल्ली नंबर वन आहे. दिल्लीत १४.५ लाख भाजपा सदस्य बनले आहेत. 

दुसऱ्या सदस्य नोंदणी टप्प्यात विशेष लक्ष

आता दुसऱ्या टप्प्यातील सदस्य नोंदणी अभियानात भाजपा युवा मोर्चाकडे विशेष भर आहे. २७ सप्टेंबरला राष्ट्रीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात सदस्यता अभियानात पुढाकार घेण्यास सांगितले आहे. युवा मोर्चा कॉलेज, इन्स्टिट्यूटमध्ये विशेष मोहिम हाती घेत पक्षाला युवा कार्यकर्त्यांशी जोडण्याचा संकल्प घेतला आहे. ३५ वर्षापेक्षा कमी युवकांना भाजपा सदस्य नोंदणीत भाग घ्यायला सांगितला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडसारख्या राज्यांना सदस्य नोंदणी अभियानापासून दूर ठेवले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र