शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:59 IST

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला

नवी दिल्ली - संसदेत केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला, त्यानंतर हे विधयेक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. आज या संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली, त्यात मोठा राडा झाला आहे. भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि विरोधी खासदारांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरात पाण्याने भरलेली काचेची बाटली टेबलावर फोडली. या घटनेनंतर टीएमसी खासदाराला एक दिवसासाठी समितीतून निलंबित करण्यात आलं आहे.

समितीच्या आजच्या बैठकीत बॅनर्जी आणि भाजपा खासदार यांच्यात वाद रंगला. यावेळी बॅनर्जींनी हा प्रकार केला, त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. ज्यामुळे प्राथमिक उपचारासाठी त्यांना बाहेर नेण्यात आले. बैठकीतून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे त्यांना बाहेर घेऊन जाताना दिसले. भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती मंगळवारी सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकिलांच्या एका गटाशी चर्चा करत होती. त्यावेळी या विधेयकाशी यांचं काय देणेघेणे असा आक्षेप विरोधी खासदारांनी घेतला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वाद सुरू झाला. 

नेमकं काय घडलं?

संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजपा खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. ज्यात रागाच्या भरात कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या टेबलाजवळ ठेवलेली काचेची पाण्याची बाटली जोरात आपटली. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. जेपीसीच्या आजच्या बैठकीत कायदेशीर बाजू मांडणारे काही मंडळी आली होती. त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी मला काही विचारायचं आहे असं म्हटलं तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही याआधी खूप बोललात. आता नाही त्यानंतर खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात वाद झाला. त्यानंतर हा प्रकार घडला. 

सोमवारीही झाला होता बैठकीत गोंधळ

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ साठी बनवलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक सोमवारीही घेण्यात आली. त्यावेळीही असाच गोंधळ झाला. जिथे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या प्रेजेंटेशनवेळी सत्ताधारी भाजपा, एनडीएचे खासदार आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. वर्षभरापूर्वीपर्यंत केंद्र सरकारला हे विधेयक आणण्याची गरज दिसत नव्हती, आता अचानक हे विधेयक आणण्यात आले आहे असं या बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले.  

टॅग्स :Parliamentसंसद