शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक संपली; पहिली उमेदवार यादी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 18:00 IST

महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील आमच्या जागांबाबत आज बैठकीत चर्चा झाली असून केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होईल. यात जागांवरील उमेदवार फायनल केले जातील. सांगली, भिवंडी आणि मुंबईतील २ जागांवर आमची चर्चा झाली. उद्याच्या मुंबईतील बैठकीत पुन्हा चर्चा होईल. दक्षिण मध्य मुंबई जागेवर आमचा दावा आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बैठकीनंतर केले. 

नाना पटोले म्हणाले की, मुंबईत आम्हाला ३ जागा हव्या होत्या, परंतु २ जागांवर आम्ही समाधानी आहोत. मेरिटवर आम्हाला पुढे जायचे आहे. प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड ज्या जागांवर निवडून आले. तिथे आमचा दावा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आघाडीतील कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढावं ही आमची भूमिका होती. त्यांनी काँग्रेस चिन्हावर लढायची इच्छा व्यक्त केली. ही जागा महाविकास आघाडीने मिळून निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे. भाजपा घाबरलेली आहे. ज्यांनी भाजपावर प्रश्नचिन्ह उभे केले ते होते त्यांनाही ते सोबत घेतायेत. अजून खूप काही समोर यायचं आहे. आम्ही ४८ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार देणार आहोत. भाजपाला हरवायचे आहे. स्वत:ला ताकदवान म्हणवणारी पार्टी किती जणांना सोबत घेतेय हे पाहिले तर ते किती घाबरलेत हे दिसते असंही नाना पटोलेंनी म्हटलं. 

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा आहे. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. मात्र शाहू महाराजांनी पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं. गुरुवारी उद्धव ठाकरे हे कोल्हापूरात आहेत. त्याठिकाणी ते शाहू महाराजांची भेट घेणार असल्याचं बोलले जाते. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४