शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक, EVM वर काढणार उपाय

By admin | Updated: May 4, 2017 12:28 IST

निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर चर्चा करण्यासाठी 12 मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वादात सापडलं आहे. विरोधकांनी निवडणुकीतील पराभवाला ईव्हीएम जबाबदार असून भाजपा ईव्हीएममध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. मतदानात ईव्हीएमचा वापर बंद करावा अशी मागणीही वारंवार होत आहे. निवडणूक आयोगाने याच मुद्यावर चर्चा करण्यासाठी 12 मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 
 
अनेक निवडणुकांच्या वेळी कोणतंही बटण दाबलं की ते मत भाजपलाच जात असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुन्हा पहिल्यासारखी म्हणजे मतदानपत्रिकेने घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याविषयी १६ विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार 12 मे रोजी ही बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षानां ईव्हीएम सुरक्षित असून त्यासोबत छेडछाड करणं कसं अशक्य आहे याची माहिती देण्यात येणार आहे. 
 
मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईव्हीएमसाठी पुढील दोन वर्षांत १६ लाखांहून अधिक व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपीएटीचा वापर केला जाणार आहे.
 
निवडणूक आयोगाने व्हीव्हीपीएटीची निर्मिती करणाऱ्या ईसीआयएल आणि बीईएलला यासंबंधीत पत्र पाठवले आहे. ही यंत्रे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांत खरेदी केली जाणार आहेत, असे पत्राद्वारे सांगितले आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत दोघांकडून प्रत्येकी आठ लाख ७५०० व्हीव्हीपीएटी यंत्रे खरेदी करण्यात येतील, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. व्हीव्हीपीएटीचा वापर केल्याने मतदान प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडण्यास मदत होईल. मतदाराने कोणत्या पक्षाला तसेच उमेदवाराला मत दिले आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे मतदारांचा निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढेल, असा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी व्यक्त केला. 
 
दरम्यान, नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारने ३, ७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.