शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रायबरेलीत भाजपतर्फे मीनाक्षी लेखी?; नवी दिल्लीतून भाजपाची 'गंभीर' खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 05:37 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधघत अमेठीतून पराभूत भाजपने स्मृती इराणी यांना तयार केले आहे.

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध रायबरेलीमधून भाजपच्या नवी दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. गांधी कुटुंबातील उमेदवारांना पराभूत करण्याच्या योजनेचा भाग भाजप नेते लेखी यांच्या नावाचा विचार करीत आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधघत अमेठीतून पराभूत भाजपने स्मृती इराणी यांना तयार केले आहे. इराणी २०१४ मध्ये अमेठीतून पराभूत झाल्यावरही भाजपने त्यांना राज्यसभेत आणून मंत्रीपद दिले. आता सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेलीत मीनाक्षी लेखी यांनी दोन हात करावेत अशी पक्षाची इच्छा आहे. मीनाक्षी लेखी पहिल्यांदा निवडून येऊनही भाजपने त्यांना विशेषाधिकार समितीचे अध्यक्षपद दिले. लेखी यांना आघाडीच्या वक्त्या म्हणून उभे केले. लेखी यांचे कुटुंब हे मूळातच गांधी-नेहरू कुटुंबाच्याविरुद्ध आहे. मीनाक्षी लेखी या दिवंगत वरिष्ठ वकील पी. एल. लेखी यांची स्नूषा असून त्यांच्या पतीला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे पद दिले आहे. गांधी घराण्याच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा निर्धारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.पुडुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या नावाचा भाजपने अमृतसरमधून विचार चालविला आहे. त्या सक्रिय राजकारणात परत येऊ इच्छितात. अमृतसरमध्ये काँग्रेसविरुद्ध सशक्त उमेदवार शोधण्यात भाजपला यश आलेले नाही. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी व अभिनेते सनी देओल यांच्या नावाची चर्चा होती परंतु, या दोघांनीही लढण्यास नकार दिला.गौतम गंभीर उतरणार?क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा भाजप नवी दिल्ली मतदारसंघासाठी विचार करीत आहे. सोनिया गांधी यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये १.७३ लाख मते मिळवणारे अजय अग्रवाल रायबरेलीतून पुन्हा लढायच्या तयारीत आहेत. परंतु, लेखी यांच्यासारखी प्रभावी वक्तृत्व असलेली व्यक्ती हा चांगला निर्णय असेल, असे पक्षाला वाटते. भाजपकडे रायबरेलीसाठी मजबूत उमेदवारच नाही.

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरBJPभाजपाcongressकाँग्रेस