शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

Afghanistan Taliban: “तालिबानला वेळीच रोखलं नाही, तर...”; शिया धर्मगुरु मौलानाचा भारताला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:05 IST

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे.

ठळक मुद्देतालिबान संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे

अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानने(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर तेथील बिघडलेल्या परिस्थितीवर शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला आहे. तालिबानविरोधात जग एकत्र येत नाही. जर वेळीच तालिबानला रोखलं नाही तर ते भारतासाठी मोठा धोका बनू शकतात असा सतर्कतेचा इशारा मौलाना कल्बे जव्वाद यांनी एका धार्मिक कार्यक्रमावेळी दिला आहे.

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे. या संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. जे लहान मुलांनाही सोडत नाहीत. काही वर्षापूर्वी तालिबानने पाकिस्तानातील एका शाळेवर हल्ला करून अनेक निष्पाप लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते असं मौलाना कल्बे जव्वाद यांनी म्हटलं आहे.

तालिबानींना रोखणं अत्यंत गरजेचे

तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे. परंतु तालिबानींविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. वेळीच तालिबानी कृत्यांना आवर घालायला हवा असं मौलाना कल्बे यांनी सांगितले. अफगाणिस्तानात सध्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे. तालिबानींनी काबुलवर कब्जा मिळवला आहे. एकीकडे शिया धर्मगुरु अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही असेही नेते आहेत जे तालिबानीच्या या कृत्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

तालिबानी माणसाच्या रुपात जनावर

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान, खासदार पुत्र आणि AIMPLB प्रवक्ते सज्जाद नोमानी तालिबानच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य करत आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु मौलाना कल्बे जव्वाद यांनी तालिबानी माणसाच्या रुपात जनावरं आहे अशी घणाघाती टीका केली आहे.

अफगाणिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, केंद्राला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला राज्याचा विशेष दर्जा परत देण्याचा आग्रहदेखील केलाय. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची अफगाणिस्तानसोबत तुलना केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्याचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्राला आमची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आणि केंद्र सरकारला "आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा, असे म्हणाल्या. तसेच, 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाचा उल्लेख करत 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला (केंद्र) जम्मू-काश्मीरवर संवाद सुरू करण्याची संधी आहे,' असंही म्हणाल्या.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत