शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban: “तालिबानला वेळीच रोखलं नाही, तर...”; शिया धर्मगुरु मौलानाचा भारताला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:05 IST

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे.

ठळक मुद्देतालिबान संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे

अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानने(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर तेथील बिघडलेल्या परिस्थितीवर शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला आहे. तालिबानविरोधात जग एकत्र येत नाही. जर वेळीच तालिबानला रोखलं नाही तर ते भारतासाठी मोठा धोका बनू शकतात असा सतर्कतेचा इशारा मौलाना कल्बे जव्वाद यांनी एका धार्मिक कार्यक्रमावेळी दिला आहे.

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे. या संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. जे लहान मुलांनाही सोडत नाहीत. काही वर्षापूर्वी तालिबानने पाकिस्तानातील एका शाळेवर हल्ला करून अनेक निष्पाप लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते असं मौलाना कल्बे जव्वाद यांनी म्हटलं आहे.

तालिबानींना रोखणं अत्यंत गरजेचे

तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे. परंतु तालिबानींविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. वेळीच तालिबानी कृत्यांना आवर घालायला हवा असं मौलाना कल्बे यांनी सांगितले. अफगाणिस्तानात सध्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे. तालिबानींनी काबुलवर कब्जा मिळवला आहे. एकीकडे शिया धर्मगुरु अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही असेही नेते आहेत जे तालिबानीच्या या कृत्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

तालिबानी माणसाच्या रुपात जनावर

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान, खासदार पुत्र आणि AIMPLB प्रवक्ते सज्जाद नोमानी तालिबानच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य करत आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु मौलाना कल्बे जव्वाद यांनी तालिबानी माणसाच्या रुपात जनावरं आहे अशी घणाघाती टीका केली आहे.

अफगाणिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, केंद्राला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला राज्याचा विशेष दर्जा परत देण्याचा आग्रहदेखील केलाय. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची अफगाणिस्तानसोबत तुलना केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्याचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्राला आमची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आणि केंद्र सरकारला "आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा, असे म्हणाल्या. तसेच, 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाचा उल्लेख करत 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला (केंद्र) जम्मू-काश्मीरवर संवाद सुरू करण्याची संधी आहे,' असंही म्हणाल्या.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत