शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban: “तालिबानला वेळीच रोखलं नाही, तर...”; शिया धर्मगुरु मौलानाचा भारताला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:05 IST

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे.

ठळक मुद्देतालिबान संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे

अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानने(Taliban) कब्जा मिळवल्यानंतर तेथील बिघडलेल्या परिस्थितीवर शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी खेद व्यक्त केला आहे. तालिबानविरोधात जग एकत्र येत नाही. जर वेळीच तालिबानला रोखलं नाही तर ते भारतासाठी मोठा धोका बनू शकतात असा सतर्कतेचा इशारा मौलाना कल्बे जव्वाद यांनी एका धार्मिक कार्यक्रमावेळी दिला आहे.

शिया धर्मगुरूने तालिबानला अमेरिका आणि इस्त्राइलनं उभारलेले क्रूर प्राण्यांचे संघटन असल्याची उपमा दिली आहे. या संघटनेत माणसं नाहीत तर क्रूर जनावरं आहेत. जे लहान मुलांनाही सोडत नाहीत. काही वर्षापूर्वी तालिबानने पाकिस्तानातील एका शाळेवर हल्ला करून अनेक निष्पाप लहान मुलांचा जीव घेतला होता. यापेक्षा जास्त क्रूरता काय असू शकते असं मौलाना कल्बे जव्वाद यांनी म्हटलं आहे.

तालिबानींना रोखणं अत्यंत गरजेचे

तालिबानला रोखणं अत्यंत गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानवर लागलं आहे. परंतु तालिबानींविरोधात जगभरात एकता दिसून येत नाही. वेळीच तालिबानी कृत्यांना आवर घालायला हवा असं मौलाना कल्बे यांनी सांगितले. अफगाणिस्तानात सध्या खूप चिंताजनक परिस्थिती आहे. तालिबानींनी काबुलवर कब्जा मिळवला आहे. एकीकडे शिया धर्मगुरु अफगाणिस्तानच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काही असेही नेते आहेत जे तालिबानीच्या या कृत्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

तालिबानी माणसाच्या रुपात जनावर

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान, खासदार पुत्र आणि AIMPLB प्रवक्ते सज्जाद नोमानी तालिबानच्या समर्थनार्थ उघडपणे भाष्य करत आहेत. सज्जाद नोमानीने भारत सरकारला तालिबानींसोबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु मौलाना कल्बे जव्वाद यांनी तालिबानी माणसाच्या रुपात जनावरं आहे अशी घणाघाती टीका केली आहे.

अफगाणिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची तुलना

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला अफगाणिस्तानातून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, केंद्राला जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करुन 2019 मध्ये रद्द करण्यात आलेला राज्याचा विशेष दर्जा परत देण्याचा आग्रहदेखील केलाय. याशिवाय त्यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची अफगाणिस्तानसोबत तुलना केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्याचा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्राला आमची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आणि केंद्र सरकारला "आमचे मार्ग सुधारणे, परिस्थिती समजून घेणे आणि आमच्या शेजारी काय चालले आहे ते पहा, असे म्हणाल्या. तसेच, 5 ऑगस्ट 2019 च्या निर्णयाचा उल्लेख करत 'महाशक्ती असलेल्या अमेरिकेला आपली पिशवी गुंडाळून पळून जावं लागलं. तुम्हाला (केंद्र) जम्मू-काश्मीरवर संवाद सुरू करण्याची संधी आहे,' असंही म्हणाल्या.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत