शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

"बंगाल, बिहारमध्येही महिलांवर अत्याचार झाले, पण त्याची तुलना मणिपूरशी करणं योग्य आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 4:39 PM

काँग्रेसच्या चिदंबरम यांचा भाजपा आणि पंतप्रधान मोदींना सवाल

Manipur Violence P Chidambaram: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये एका नग्न महिलेची परेड केल्याचं प्रकरण चर्चेत आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मनात वेदना आणि राग दोन्ही आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा घटना सहन करू शकत नाही. यासोबतच ते म्हणाले होते की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड किंवा मणिपूरचे असो, या घटनांना आळा घालायचा आहे. मणिपूरच्या दोषींना सोडले जाणार नाही. पंतप्रधानांच्या या वाक्यावर काँग्रेस नेते आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री पी चिंदबरम यांनी आक्षेप घेतला. राजस्थान आणि छत्तीसगड आणि मणिपूर एकत्र बोलून पंतप्रधान नक्की काय सुचवू पाहत आहेत. बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचार झाल्याचे मान्य केले तरी या राज्यांच्या घटनांची तुलना मणिपूर प्रकरणाशी होऊच शकत नाही.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर साधला निशाणा

पी चिदंबरम यांची ही टिप्पणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर आली. अनुराग ठाकूर म्हणाले होते की, काँग्रेस शासित राज्यांमध्येही महिलांविरोधात गंभीर गुन्हे घडले आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते राजकारण करत आहेत, ही वेगळी बाब आहे. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राजस्थानमध्ये गेल्या चार वर्षांत महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. सुमारे एक लाख गुन्हे दाखल झाले. त्यातील सुमारे 33 हजार प्रकरणे महिलांवरील लैंगिक छळाशी संबंधित आहेत.

चिदंबरम यांनी दिलं उत्तर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानशी तुलना कशी करता येईल. या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार झाले हे मान्य करू पण त्याची तुलना मणिपूरशी करणं शक्य नाही. घाटी भागात कुकीज शिल्लक आहेत का? चुराचंदपूरमध्ये मेईतेई समुदायातील कोणी आहे का? जर अहवाल बरोबर असतील तर मणिपूरमध्ये जातीय शुद्धीकरण मोहीम पूर्ण झाली आहे, अशी रोखठोक मतही त्यांनी मांडले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीAnurag Thakurअनुराग ठाकुर