शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:41 IST

Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला असून, अनेक ठिकामी कुकी आणि मेईतेई समाज रस्त्यावर उतरला आहे.

Manipur Violence Latest News: मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत जळतोय. राज्यातील जिरीबाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अतिरेक्यांनी 6 जणांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या केली. यामुळे परिसरात स्थानिक लोक तीव्र विरोध करत आहेत. अनेक मंत्र्यांच्या घरांवर हल्ले झाले असून, आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

कुकी अतिरेक्यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर मेईतेई समाजाचे संतप्त लोक रस्त्यावर उतरले आहेत. ते सातत्याने हिंसक आंदोलन करत आहेत. दुसरीकडे, कुकी समुदाय 11 नोव्हेंबरच्या चकमकीला बनावट म्हणत आहे. 

आता काय परिस्थिती आहे?मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वीसारखीच झाली आहे. राज्यातील अनेक भाग हिंसाचाराच्या विळख्यात आहेत. एकीकडे कुकी समाजाचे लोक आपल्या मागण्यांसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहेत, तर दुसरीकडे एकाच कुटुंबातील सहा जणांच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत मेईती समाज रस्त्यावर उतरला आहे. सध्याची परिस्थिती पाहता 19 नोव्हेंबर रोजी मणिपूरमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, इंटरनेट सेवाही आधीच बंद आहे.

नवीन आव्हान काय आहे?कुकी समाजाचे लोक या हिंसाचारात मारल्या गेलेल्यांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी चुरचंदपूर येथेही शेकडो लोकांनी निदर्शने केली. कुकी संघटनांनी असा दावाही केला आहे की, जे लोक मरण पावले ते अतिरेकी नसून गावातील स्वयंसेवक होते. दरम्यान, कुकी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी प्रमुख संघटना, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम, केंद्रीय पोलीस दलाच्या गोळीबारात ठार झालेल्या 10 कुकी तरुणांचे शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे म्हटले आहे. दुसरीकडे, मेईतेई समाजही रस्त्यावर उतरला असून, एकाच कुटुंबातील 6 जणांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या करणाऱ्या कुकी अतिरेक्यांवर कठोर कारवाई न झाल्यास मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आहे.

गृहमंत्री काय म्हणाले?केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर 2024) सलग दुसऱ्या दिवशी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थिती आणि तेथे सुरक्षा दलांच्या तैनातीचा आढावा घेतला. शाह यांनी उच्च अधिकाऱ्यांना जातीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने CAPF च्या आणखी 50 कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे आता राज्यात CAPF च्या एकूण 268 कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत. म्हणजेच, राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात तैनात असलेल्या सैनिकांची संख्या 26,800 पर्यंत वाढेल. या 50 कंपन्यांमध्ये सर्वाधिक संख्या सीआरपीएफ कंपन्यांची असेल, तर उर्वरित कंपन्या बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या असतील. 

सरकारचे काय प्रयत्न आहेत?मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने हिंसाचारग्रस्त सात जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने CAPF च्या 50 अतिरिक्त कंपन्या येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना शांततेचे आवाहनही केले जात आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmit Shahअमित शाहPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी