शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:04 IST

Jitendra Awhad : मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या तोडफोडीबाबतचा व्हिडीओ पोस्ट करणं जितेंद्र आव्हाडांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.

Loksabha Election : देशभरात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. देशात 88 मतदारसंघात मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. मात्र या निवडणुकीत काही ठिकाणी गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरु असलेल्या मणिपूरमधील एक धक्कादायक व्हिडीओ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मणिपूरमधील मतदान केंद्रावर हिंसाचार आणि तोडफोड झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २२ एप्रिल रोजी या मतदारसंघात पुन्हा मतदान पार पडलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी याच संदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट करत कोणतेही बटन दाबल्यानंतर कमळालाच मत जात असल्याचे म्हटलं होतं. यासोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता ज्यामध्ये काही महिला मतदान केंद्रावर तोडफोड करताना दिसत होत्या.

जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं?

“मणिपूरमध्ये महिलांनी कोणतेही बटन दाबल्यानंतर फक्त कमळच छापलेले दिसत असल्याचे पाहून ईव्हीएम मशीन फोडले. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेपासाठी आवाहन करतो. इतर पक्षाचे चिन्ह छापलेले पाहून भाजप कार्यकर्त्यांना राग येतो असे का होत नाही?,” अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

मणिपूर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

“फेक न्यूज: येथे दिसणारा व्हिडिओ हा इम्फाळ पूर्वेतील एका मतदान केंद्रात (३/२१ खुराई विधानसभा) जमावाच्या हिंसाचाराचा आहे आणि त्या मतदान केंद्रावर २२ एप्रिल २०२४ रोजी फेरमतदान आधीच झाले आहे. VVPAT द्वारे आलेल्या पेपर स्लिपमध्ये आणि बॅलेट युनिटवर दाबलेल्या बटणाचे चिन्ह जुळत नसल्याचा आरोप कोणीही केलेला नाही किंवा सापडला नाही. फेक न्यूज पसरवल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असे मणिपूर निवडणूक आयोगाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये महिलांनी ईव्हीएम फोडल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे सत्य समोर आलं होतं. मणिपूरमधील मोइरांग कंपू येथील मतदान केंद्रावर स्थानिक लोकांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत ईव्हीएमची तोडफोड केली होती. १९ एप्रिलच्या घटनेनंतर निवडणूक आयोगाने मणिपूरमध्ये ११ मतदान केंद्रांवर झालेल्या निवडणुका रद्द घोषित केल्या आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील सात केंद्रांवर आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील चार केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे जाहीर केले. मुक्त आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करण्यासाठी या मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासह अतिरिक्त सुरक्षा दलांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४manipur lok sabha election 2024मणिपूर लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा