शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

काश्मीरला जाणारे मंत्री 'डरपोक', मणिशंकर अय्यर यांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 9:31 AM

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे.

तिरुअनंतपूरमः काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी मणिशंकर अय्यर यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्यांनी सरकारनं काश्मीरच्या दौऱ्यावर 36 मंत्र्यांना पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली. भाजपाचे लोक हे दगाबाज आहेत. ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. सरकार काश्मीर खोऱ्यात 36 मंत्री पाठवणार होती. पण त्या 36 पैकी 31 मंत्री जम्मूला, तर फक्त पाच मंत्री काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हे लोक डरपोक आहेत, काश्मीर खोऱ्यातील जनतेच्या उद्रेकाची यांना भीती वाटत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळं करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील लोकांवर अत्याचार होत आहेत. चार हजार नेत्यांना तुरुंगात बंद करण्यात आलं आहे. देशात असे काही देशद्रोही आहेत, त्यांना आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत. प्रत्येक समाजात काही विश्वासघातकी लोक असतात, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने मणिशंकर अय्यर वादात सापडले होते. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे 2018मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.