शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

मंडलनिहाय नोंदीने पावसाचे वास्तव स्पष्ट

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती

६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस : पाण्याची बिकट परिस्थिती
अरुण बारसकर
सोलापूर: अवघा १६ टक्के पाऊस झाल्याने सोलापूर जिल्‘ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खोलवर जात आहे.
राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्‘ात निचांकी पाऊस पडला आहे. जिल्‘ात अवघा १६ टक्के पाऊस पडला आहे. एकीकडे सोलापूर जिल्‘ात पाऊस नाही तर दुसरीकडे उजनी धरणातील पाणीही कमी होत आहे. यामुळे पाण्याची स्थिती अधिकच नाजूक बनू लागली आहे. सोलापूर जिल्‘ातील ९१ मंडलांपैकी ६६ मंडलांमध्ये यावर्षीच्या पावसाळ्यात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवघ्या २५ मंडलात १०० मि.मी. पेक्षा अधिक अन् १५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्‘ात आतापर्यंत एकूण ८४५ मि.मी. इतका तर सरासरी ७७ मि. मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण १७८९ मि.मी. व सरासरी १६२ मि.मी. इतका पाऊस पडला होता. बागायती क्षेत्रासाठीच्या स्पर्धेमुळे बोअरवेलने केलेली जमिनीची चाळण व पाऊस गायब झाल्याने शेतीपिके दिसेनाशी झाली आहेत.
चौकट
यंदा पाऊसच पडला नाही
जिल्‘ातील दहिगाव(माळशिरस), मंडलामध्ये १४ मि.मी.,कोळा(सांगोला) या मंडलात १५ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस मागील तीन महिन्यात पडला आहे. अन्य मंडलातील अनेक गावात यावर्षी पावसाचा थेंबही पडला नाही. कधीतरी अन् एखाद्या गावात चार-चार थेंब पडलेल्या पावसाची आकडेवारी १४ मि.मी. पर्यंत पोहोचली आहे.
चौकट
० मैंदर्गीत सर्वाधिक पाऊस..
मार्डी, मुस्ती, बार्शी, खांडवी, आगळगाव, पांगरी, पानगाव, नारी, सुर्डी, वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, तडवळ, करजगी, नरखेड,रांझणी, कुर्डूवाडी, म्हैसगाव, करमाळा, केम, अर्जुननगर, पंढरपूर, तुंगत, पुळूज, बोराळे या मंडलामध्ये १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक १६९ मि.मी. पाऊस मैंदर्गी मंडलामध्ये पडला आहे.
० शेळगी, वळसंग, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), वाघोली, कामती बु., पेनूर, टाकळी सिकंदर, जेऊर(करमाळा), उमरड, कासेगाव(पंढरपूर), भंडीशेगाव, पटवर्धनकुरोली, हतीद, शिवणे या मंडलामध्ये २५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे.
चौकट
तर वाळवंटाचे स्वरूप..
सोलापूर जिल्‘ात बागायती क्षेत्र वाढीसाठी ७०० फुटांपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल घेतले आहेत. हे बोअरवेल सध्या कोरडे पडू लागले आहेत. २००-३०० फुटांपर्यंतचे अनेक भागातील बोअर केव्हाच कोरडे पडले आहेत. आगामी कालावधीत पाऊस नाही पडला तर जिल्‘ाला वाळवंटासारखे स्वरूप येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.