शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ममता दिदींना दणका, चिट फंड प्रकरणाच्या CBI चौकशीचे आदेश

By admin | Updated: May 9, 2014 11:54 IST

पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्यात ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाने दणका दिला असून या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 
२०१३ मध्ये पश्चिम बंगालमध्ये शारदा चिटफंड घोटाळा उघड झाला होता. सुमारे २५०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात कंपनीने गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले पण त्यांना योग्य मोबदला दिलेला नव्हता. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची चौकशीही होती. घोटाळ्याचे पाळेमुळे आसाम व ओदिशा या भागातही पोहोचले होते.पश्चिम बंगाल व अन्य दोन राज्यांचे पोलिस या घोटाळ्याचा तपास करत होते. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर निर्णय दिला. कोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयनेच करावा असे आदेश दिले असून प.बंगाल, आसाम व ओदिशा येथील पोलिसांनी सीबीआय तपासासाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती सीबीआयला उपलब्ध करुन द्यावीत असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच शारदा कंपनी व ओदिशातील ४४ अन्य कंपन्यांचीही सीबीआयनेच चौकशी करावी असेही कोर्टाने सांगितले आहे.