शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:09 IST

संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge on Nirmala Sitharaman: लोकसभेत संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज राज्यसभेत संविधानावर चर्चा झाली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चर्चेला सुरुवात केली. चर्चेदरम्यान निर्मला सीतारमण यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत काँग्रेसला घेरलं. काँग्रेस निर्लज्जपणे संविधान दुरूस्ती करत राहिल्याचेही निर्मला सीतारमण म्हणाल्या. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. निर्मला सीतारमण जेएनयूमध्ये काय शिकल्या हे माहिती नाही, असं विधान खरगे यांनी केलं आहे.

संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भूतकाळात घेतलेल्या निर्णयांवरून काँग्रेसवर ताशेरे ओढले. काँग्रेसने भाषण स्वातंत्र्यावर बंधने आणल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे. तसेच कवी मजरूह सुलतानपुरी यांच्या अटकेपासून ते किस्सा कुर्सी का चित्रपटावर बंदी घालण्यापर्यंतचे मुद्दे उपस्थित केले. यानंतर प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.

"आता त्यांना सांगावं लागतं की आम्हालाही थोडं वाचायचं येतं. आम्ही पालिकेच्या शाळेत शिकलो आहोत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. पण तिथे त्यांनी काय शिक्षण घेतलं माहिती नाही. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे देश बनवण्यात मोठं योगदान आहे. इथे शिक्षण घेतलेल्यांनी जगात नाव केलं आहे आणि ते संविधानावर विश्वास ठेवतात. पण त्याचं इंग्रजी चांगलं असू शकतं, त्याचं हिंदीही चांगलं असू शकतं हे निश्चित. सर्व काही चांगले असू शकते, पण त्यांचे काम चांगले नाही," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"जे राष्ट्रध्वजाचा द्वेष करतात, जे आमच्या अशोक चक्राचा द्वेष करतात, जे संविधानाचा द्वेष करतात असे लोक आपल्याला शिकवू पाहत आहेत. संविधान बनले तेव्हा या लोकांनी ते जाळले. ज्या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, त्या दिवशी त्यांनी रामलीला मैदानावर  बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचे दहन केले. १९४९ मध्ये आरएसएसच्या नेत्यांनी भारतीय संविधानाला विरोध केला कारण ते मनुस्मृतीवर आधारित नव्हते. त्यांनी ना संविधान स्वीकारले ना तिरंगा. २६ जानेवारी २००२ रोजी आरएसएसच्या मुख्यालयात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. कारण त्यासाठी न्यायालयाचा आदेश होता," असंही णल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा