शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:09 IST

संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.

Mallikarjun Kharge on Nirmala Sitharaman: लोकसभेत संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज राज्यसभेत संविधानावर चर्चा झाली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चर्चेला सुरुवात केली. चर्चेदरम्यान निर्मला सीतारमण यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत काँग्रेसला घेरलं. काँग्रेस निर्लज्जपणे संविधान दुरूस्ती करत राहिल्याचेही निर्मला सीतारमण म्हणाल्या. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. निर्मला सीतारमण जेएनयूमध्ये काय शिकल्या हे माहिती नाही, असं विधान खरगे यांनी केलं आहे.

संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भूतकाळात घेतलेल्या निर्णयांवरून काँग्रेसवर ताशेरे ओढले. काँग्रेसने भाषण स्वातंत्र्यावर बंधने आणल्याचा आरोप सीतारमण यांनी केला आहे. तसेच कवी मजरूह सुलतानपुरी यांच्या अटकेपासून ते किस्सा कुर्सी का चित्रपटावर बंदी घालण्यापर्यंतचे मुद्दे उपस्थित केले. यानंतर प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला.

"आता त्यांना सांगावं लागतं की आम्हालाही थोडं वाचायचं येतं. आम्ही पालिकेच्या शाळेत शिकलो आहोत. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. पण तिथे त्यांनी काय शिक्षण घेतलं माहिती नाही. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे देश बनवण्यात मोठं योगदान आहे. इथे शिक्षण घेतलेल्यांनी जगात नाव केलं आहे आणि ते संविधानावर विश्वास ठेवतात. पण त्याचं इंग्रजी चांगलं असू शकतं, त्याचं हिंदीही चांगलं असू शकतं हे निश्चित. सर्व काही चांगले असू शकते, पण त्यांचे काम चांगले नाही," असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

"जे राष्ट्रध्वजाचा द्वेष करतात, जे आमच्या अशोक चक्राचा द्वेष करतात, जे संविधानाचा द्वेष करतात असे लोक आपल्याला शिकवू पाहत आहेत. संविधान बनले तेव्हा या लोकांनी ते जाळले. ज्या दिवशी संविधानाचा स्वीकार करण्यात आला, त्या दिवशी त्यांनी रामलीला मैदानावर  बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांचे दहन केले. १९४९ मध्ये आरएसएसच्या नेत्यांनी भारतीय संविधानाला विरोध केला कारण ते मनुस्मृतीवर आधारित नव्हते. त्यांनी ना संविधान स्वीकारले ना तिरंगा. २६ जानेवारी २००२ रोजी आरएसएसच्या मुख्यालयात पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला. कारण त्यासाठी न्यायालयाचा आदेश होता," असंही णल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभा