शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 21:51 IST

'काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करणार.'

नवी दिल्ली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी रेल्वेच्या दुरवस्थेवरुन भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने रेल्वेची आर्थिक हानी केली, रेल्वेची सुरक्षा, सामर्थ्य आणि कार्यक्षमता नष्ट करुन रेल्वेची नासधूस केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणतात, नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे उद्ध्वस्त झाली. सरकारने रेल्वे गाड्यांना स्वतःच्या प्रचाराचे साधन बनवले. रेल्वे आजही करोडो भारतीयांची जीवनवाहिनी आहे, पण मोदींच्या राजवटीत तिची अवस्था बिकट होत आहे. CAG-2023 चा हवाला देऊन ते म्हणाले की, वेळेवर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या 2012-13 मधील 79 टक्क्यांवरून 2018-19 मध्ये 69.23 टक्क्यांवर आली. 58,459 कोटी रुपयांपैकी केवळ 0.7 टक्के निधी ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी खर्च केला जातो. यामुळेच वंदे भारत हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग ताशी 180 किमी ऐवजी केवळ 83 किमी प्रतितास आहे.

2031 पर्यंत 750 रेल्वे स्थानकांपैकी 30 टक्के आणि सर्व मालगाड्यांचे खाजगीकरण केले जाणार. सर्व नफा कमावणाऱ्या एसी कोचचेही खाजगीकरण केले जाईल. रेल्वेकडे फक्त तोट्यात असलेल्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासी गाड्या उरल्या आहेत, असा दावाही खर्गेंनी यावेळी केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारला सात प्रश्नही विचारले.

  1. भाजप सरकारने रेल्वेतील 3 लाखांहून अधिक रिक्त जागा का भरल्या नाहीत? 
  2. प्रति किलोमीटर प्रति प्रवासी सरासरी भाडे 2013-14 (UPA) मधील 0.32 वरुन 2023 मध्ये 0.66 पैसे का झाले?
  3. 2017 ते 2021 दरम्यान ट्रेनशी संबंधित 100,000 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले, हे खरे नाही का? 
  4. कोव्हिड महामारीच्या काळात मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठीच्या सवलती का रद्द केल्या?
  5. CAG नुसार, ₹58,459 कोटींपैकी फक्त 0.7% निधी ट्रॅक नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आला. का?
  6. रेल्वे अर्थसंकल्प विलीन करुन मागच्या दाराने निधी कमी करण्याच्या हालचाली झाल्या, हे खरे नाही का?
  7. मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाची एक भव्य योजना सुरू केली आणि वाढीव खाजगीकरण आधीच सुरू झाले, हे खरे नाही का? असे प्रश्न खर्गे यांनी मोदी सरकारला विचारले.
टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार