शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

सरकारचे बहुमत राज्यपालांच्या मर्जीने नव्हे, फक्त विधानसभेतच होते सिद्ध - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 07:04 IST

बहुमताचा पाठिंबा असलेले सरकारच सत्तेवर येऊ शकते व असेच सरकार राज्य करू शकते. सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून नसतो, तर विधानसभेतच तो होऊ शकतो

नवी दिल्ली : बहुमताचा पाठिंबा असलेले सरकारच सत्तेवर येऊ शकते व असेच सरकार राज्य करू शकते. सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून नसतो, तर विधानसभेतच तो होऊ शकतो, असा स्पष्ट निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या घोळावर पडदा टाकण्याच्या दिशेने निर्णायकी पाऊल टाकले.स्थिर सरकार व सुशासन हा जनतेचा हक्क आहे, हे अधोरेखित करत न्यायालयाने असेही नमूद केले की, आमदारांच्या फोडाफोडीसारख्या बेकायदा प्रकारांना पायबंद बसावा, लोकशाही प्रक्रिया सुरळितपणे सुरू राहावी आणि राज्यात स्थिर सरकारची शाश्वती व्हावी, यासाठी सरकारने विधानसभेत लगेच बहुमत सिद्ध करणे गरजेचे आहे.शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या याचिकेवर हा अंतरिम आदेश देताना न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षणे नोंदविली. न्यायसंस्था व विधिमंडळ या राज्यघटनेने स्थापन केलेल्या लोकशाहीच्या दोन स्तंभांनी परस्परांच्या मर्यादा ओळखून काम करणे अपेक्षित असले, तरी लोकशाहीेची शुचिता कायम राखण्यासाठी व घटनात्मक नीतिमत्ता अबाधित ठेवण्याचा अखेरचा उपाय म्हणून काही वेळा न्यायालयास हस्तक्षेप करणे गरजेचे ठरते. हे प्रकरण असे अपवादात्मक वर्गात मोडणारे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.महाराष्ट्रात राज्यपालांनी नेमलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी सायंकाळी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, असा अंतरिम आदेश देताना न्यायालयाने पुढील निर्देश दिले -राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांची तत्काळ नियुक्ती करावी...हंगामी अध्यक्षांनी नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ देण्याचे काम पूर्ण करावे.शपथविधी उरकताच हंगामी अध्यक्षांनी फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शकठरावाचे कामकाज सुरू करावे. विश्वासदर्शक ठरावावर गुप्त मतदान घेण्यात येऊ नये. मतदानाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे.नंतरच्या घटनाक्रमानंतर विश्वासदर्शक ठरावमंजूर करून घेण्याची गरजच राहिली नाही.हा आदेश देताना खंडपीठाने कर्नाटक (सन २०१८ व १९९६), गोवा (२०१७), उत्तराखंड (२०१६), झारखंड (२०१५) व उत्तर प्रदेश (१९९९) या राज्यांत अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना दिलेल्या निकालांचा आधार घेतला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय