शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:42 IST

AAP Mehraj Malik And Omar Abdullah : जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथील आम आदमी पक्षाने लोकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथील आम आदमी पक्षाने लोकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना दोडा जिल्ह्यात पीठ, तांदूळ आणि साखर यासारख्या जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात पुरवण्याचं आवाहन केलं आहे.

आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांनी 'एक्स' वर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि सतीश शर्मा यांना मोठं आवाहन केलं आहे. "मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की, दोडा जिल्हा आणि विधानसभेत रेशनचा मोठा तुटवडा आहे. विशेषतः दुकानांमध्ये पीठ, तांदूळ आणि साखर उपलब्ध नाही. दुकानांमध्ये या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध नसल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे."

"कृपया सरकारी दुकानांमध्ये पुरवठा करा. आम्ही सर्वजण तयार आहोत पण वेळेवर आवश्यक असलेला अन्न पुरवठा करा" असं मेहराज मलिक यांनी म्हटलं आहे. मेहराज मलिक हे जम्मू आणि काश्मीरच्या दोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी भाजपाच्या गजय सिंह राणा यांचा पराभव केला होता. 

मेहराज मलिक हे दोडा जिल्हा विकास परिषदेचे सदस्यही राहिले आहेत. २०२१ मध्ये मेहराज मलिक यांनी डीडीसी निवडणुकीत विजय मिळवला. मलिक यांनी २०१४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. २०२४ मध्ये ते आम आदमी पक्षात सामील झाले आणि दोडा विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. जम्मू-काश्मीर विधानसभेत ते एकमेव आप आमदार आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAAPआपOmar Abdullahउमर अब्दुल्लाfoodअन्न