शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

आंध्र प्रदेशात मोठा अपघात; अनियंत्रीत बस पुलावरुन नदीत पडली, 9 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:00 IST

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

अमरावती:आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. गोदावरी जिल्ह्यातील जांगरेड्डीगुडेम येथे, तोल गेल्याने बस नदीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. अपघातातील किरकोळ जखमींना जांगारेड्डीगुडेम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तर गंभीर जखमी प्रवाशाला एलुरु येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये 45 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, बस तेलंगणातील अस्वरपेट येथून जांगारेड्डीगुडेमला जात होती. जालेरू नदीवरील पुलावर विरुद्ध दिशेने येणारी एक लॉरी टाळण्यासाठी बस चालकाने मार्ग वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

सरकारने भरपाई जाहीर केली

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे परिवहन मंत्री पी वेंकटरामय्या यांनी सांगितले. राज्यपाल बी.बी. हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एस शैलजानाथ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस एस विष्णुवर्धन रेड्डी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश