शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आंध्र प्रदेशात मोठा अपघात; अनियंत्रीत बस पुलावरुन नदीत पडली, 9 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:00 IST

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

अमरावती:आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. गोदावरी जिल्ह्यातील जांगरेड्डीगुडेम येथे, तोल गेल्याने बस नदीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. अपघातातील किरकोळ जखमींना जांगारेड्डीगुडेम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तर गंभीर जखमी प्रवाशाला एलुरु येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये 45 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, बस तेलंगणातील अस्वरपेट येथून जांगारेड्डीगुडेमला जात होती. जालेरू नदीवरील पुलावर विरुद्ध दिशेने येणारी एक लॉरी टाळण्यासाठी बस चालकाने मार्ग वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

सरकारने भरपाई जाहीर केली

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे परिवहन मंत्री पी वेंकटरामय्या यांनी सांगितले. राज्यपाल बी.बी. हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एस शैलजानाथ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस एस विष्णुवर्धन रेड्डी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश