शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

आंध्र प्रदेशात मोठा अपघात; अनियंत्रीत बस पुलावरुन नदीत पडली, 9 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:00 IST

या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

अमरावती:आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. गोदावरी जिल्ह्यातील जांगरेड्डीगुडेम येथे, तोल गेल्याने बस नदीत कोसळली. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. अपघातातील किरकोळ जखमींना जांगारेड्डीगुडेम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तर गंभीर जखमी प्रवाशाला एलुरु येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बसमध्ये 45 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राहुल देव शर्मा यांनी सांगितले की, बस तेलंगणातील अस्वरपेट येथून जांगारेड्डीगुडेमला जात होती. जालेरू नदीवरील पुलावर विरुद्ध दिशेने येणारी एक लॉरी टाळण्यासाठी बस चालकाने मार्ग वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

सरकारने भरपाई जाहीर केली

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे परिवहन मंत्री पी वेंकटरामय्या यांनी सांगितले. राज्यपाल बी.बी. हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी बस अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एस शैलजानाथ आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस एस विष्णुवर्धन रेड्डी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीAndhra Pradeshआंध्र प्रदेश