शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Politics: '...तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत कसे', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 19:58 IST

Supreme Court: शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (11 मे) निकाल दिला आहे.

Jairam Ramesh On SC Verdict: शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (11 मे) निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा दिला होता, त्यामुळे यथास्थिती पूर्ववत करता येणार नाही, असे म्हणत न्यायालयाने परिस्थिती पूर्ववत करण्यास नकार दिला. आता या प्रकरणावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "आज, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की - राज्यपालांनी पहिले जे केले ते बेकायदेशीर होते, अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर होता, व्हिप जारी करणेही बेकायदेशीर होते. माझे ज्येष्ठ सहकारी अभिषेक सिंघवी यांच्या शब्दात सांगायचे तर, शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेत राहण्याचा कोणता नैतिक अधिकार आहे? मुंबईतील डबल इंजिनचे सरकार तिप्पट बेकायदेशीर आहे," असे रमेश म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. यावेळी निरीक्षणे नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट, राज्यपाल यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मात्र, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उद्धव ठाकरेंना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी बोलावणे योग्य नव्हते. कारण ठाकरे यांनी सभागृहातील बहुमत गमावले आहे, असा निष्कर्ष काढण्याचे कोणतेही कारण नव्हते.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा दिला असल्याने सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून राज्यपालांनी शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे योग्यच होते. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची शिवसेनेचा व्हिप म्हणून नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षcongressकाँग्रेसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय