शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
2
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
3
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
4
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
5
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
6
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
7
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
8
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
9
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
10
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
11
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
12
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
13
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
14
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
15
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
16
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
17
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
18
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
19
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
20
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:39 IST

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, शेतीच्या नुकसानाची पाहणी करून त्या आधारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, अतिवृष्टी, पूर आदी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पुरेशी मदत करणार आहे. त्यासाठी राज्याला आवश्यक ती रक्कम केंद्राने उपलब्ध करून दिली आहे.

चौहान म्हणाले की, नुकसानाचे मूल्यांकन करताना ‘क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट’ केले जाईल किंवा राज्याने हवामान आधारित पीक विमा योजना स्वीकारली असल्यास तिच्या निकषांनुसार नुकसानीचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा केली जाईल.

मी स्वतःही महाराष्ट्राला जाऊन आलो आहे. पिकांचे जितके नुकसान झाले आहे, त्याचा आढावा घेऊन त्याच्या आधारे केंद्र सरकार पीक विमा योजनेतून रक्कम देईल, तसेच एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) अंतर्गत देखील आम्ही महाराष्ट्राला निधी देणार आहोत.

यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारने पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राज्याला मदत दिली जाईल. यासंदर्भात लोकसभेत शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी प्रश्न विचारला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers to Receive Direct Aid After Crop Loss Assessment

Web Summary : Union Agriculture Minister assures Maharashtra farmers of financial aid for crop damage due to excessive rain and floods. Assessments will be conducted, and funds disbursed directly to farmers' accounts via crop insurance and NDRF. The central government is committed to providing necessary assistance based on the state's report.
टॅग्स :Farmerशेतकरी