हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील आकस्मिक मृत्यूंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) नुसार, देशभरात झालेल्या ६३,६०९ मृत्यूंपैकी महाराष्ट्रात २१,३१० इतकी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक तिसरा आकस्मिक मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. हा वाटा ३३.५ टक्के इतका आहे.
तामिळनाडूमध्ये अंदाजे ४,१०० अचानक मृत्यूची नोंद झाली, तर उत्तर प्रदेशात सुमारे ३,७०० मृत्यू झाले. अनेक मोठ्या राज्यांच्या एकत्रित एकूण संख्येपेक्षा एकट्या महाराष्ट्रात जास्त आकस्मिक मृत्यू झाले. राज्यातील २१,३१० आकस्मिक मृत्यूंपैकी १७,६६१ पुरुष, ३,६४८ महिला आणि एक ट्रान्सजेंडर नोंदवला गेला. राष्ट्रीय स्तरावर एकूण आकस्मिक मृत्यूंपैकी ३५,६३७ जण हृदयविकाराने मृत्युमुखी पडले, तर उर्वरित २७,९७२ जण इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात, हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या १४,१६५ इतकी आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघातानंतर आकस्मिक मृत्यू हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हे मृत्यू पाण्यात बुडणे, विषबाधा किंवा रस्ते अपघात यासारख्या ओळखण्यायोग्य घटनांशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे होतात. राष्ट्रीय स्तरावर २०२३ मध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रमाण १४.५ टक्के होते. ते मागील वर्षाच्या तुलनेत १२.३% वाढले. महाराष्ट्रात एकूण अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली.
तामिळनाडू, उ. प्रदेशात अचानक मृत्यू लक्षणीय
एकूण ६९,८०९ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे आकस्मिक होते. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही अचानक मृत्यूंची लक्षणीय संख्या नोंदवली गेली; परंतु त्यांचा वाटा महाराष्ट्रापेक्षा कमी राहिला. संपूर्ण देशात २०२२ मध्ये आकस्मिक मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५६,६५३ होती. ती २०२३ मध्ये ६३,६०९ झाली. म्हणजेच ६,९५६ प्रकरणांची वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात २,२५७ ने वाढ झाली.
Web Summary : Maharashtra recorded the highest number of accidental deaths in India, according to NCRB. The state accounted for 33.5% of the country's total, with heart attacks being a major cause. The accidental deaths increased significantly compared to the previous year.
Web Summary : एनसीआरबी के अनुसार, भारत में महाराष्ट्र में आकस्मिक मृत्यु दर सबसे ज़्यादा है। देश के कुल आकस्मिक मौतों का 33.5% हिस्सा महाराष्ट्र का है, जिसमें हृदयघात एक प्रमुख कारण है। पिछले वर्ष की तुलना में आकस्मिक मौतों में काफ़ी वृद्धि हुई है।