शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
2
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
3
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
4
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
5
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
6
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
7
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
8
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
9
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
10
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
11
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
12
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
13
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
14
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
15
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
16
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
17
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
18
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
19
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

Deaths: आकस्मिक मृत्युंच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम, एनसीआरबी अहवालातील धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:29 IST

Highest accidental deaths India: देशातील आकस्मिक मृत्युंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील आकस्मिक मृत्यूंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) नुसार, देशभरात झालेल्या ६३,६०९ मृत्यूंपैकी महाराष्ट्रात २१,३१० इतकी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक तिसरा आकस्मिक मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. हा वाटा ३३.५ टक्के इतका आहे.

तामिळनाडूमध्ये अंदाजे ४,१०० अचानक मृत्यूची नोंद झाली, तर उत्तर प्रदेशात सुमारे ३,७०० मृत्यू झाले. अनेक मोठ्या राज्यांच्या एकत्रित एकूण संख्येपेक्षा एकट्या महाराष्ट्रात जास्त आकस्मिक मृत्यू झाले. राज्यातील २१,३१० आकस्मिक मृत्यूंपैकी १७,६६१ पुरुष, ३,६४८ महिला आणि एक ट्रान्सजेंडर नोंदवला गेला. राष्ट्रीय स्तरावर एकूण आकस्मिक मृत्यूंपैकी ३५,६३७ जण हृदयविकाराने मृत्युमुखी पडले, तर उर्वरित २७,९७२ जण इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात, हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या १४,१६५ इतकी आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघातानंतर आकस्मिक मृत्यू हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हे मृत्यू पाण्यात बुडणे, विषबाधा किंवा रस्ते अपघात यासारख्या ओळखण्यायोग्य घटनांशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे होतात. राष्ट्रीय स्तरावर २०२३ मध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रमाण १४.५ टक्के होते. ते मागील वर्षाच्या तुलनेत १२.३% वाढले. महाराष्ट्रात एकूण अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. 

तामिळनाडू, उ. प्रदेशात अचानक मृत्यू लक्षणीय

एकूण ६९,८०९ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे आकस्मिक होते. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही अचानक मृत्यूंची लक्षणीय संख्या नोंदवली गेली; परंतु त्यांचा वाटा महाराष्ट्रापेक्षा कमी राहिला. संपूर्ण देशात २०२२ मध्ये आकस्मिक मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५६,६५३ होती. ती २०२३ मध्ये ६३,६०९ झाली. म्हणजेच ६,९५६ प्रकरणांची वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात २,२५७ ने वाढ झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Tops in Accidental Deaths, Shocking NCRB Report Reveals

Web Summary : Maharashtra recorded the highest number of accidental deaths in India, according to NCRB. The state accounted for 33.5% of the country's total, with heart attacks being a major cause. The accidental deaths increased significantly compared to the previous year.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू