शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Deaths: आकस्मिक मृत्युंच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम, एनसीआरबी अहवालातील धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:29 IST

Highest accidental deaths India: देशातील आकस्मिक मृत्युंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. 

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील आकस्मिक मृत्यूंच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) नुसार, देशभरात झालेल्या ६३,६०९ मृत्यूंपैकी महाराष्ट्रात २१,३१० इतकी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक तिसरा आकस्मिक मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. हा वाटा ३३.५ टक्के इतका आहे.

तामिळनाडूमध्ये अंदाजे ४,१०० अचानक मृत्यूची नोंद झाली, तर उत्तर प्रदेशात सुमारे ३,७०० मृत्यू झाले. अनेक मोठ्या राज्यांच्या एकत्रित एकूण संख्येपेक्षा एकट्या महाराष्ट्रात जास्त आकस्मिक मृत्यू झाले. राज्यातील २१,३१० आकस्मिक मृत्यूंपैकी १७,६६१ पुरुष, ३,६४८ महिला आणि एक ट्रान्सजेंडर नोंदवला गेला. राष्ट्रीय स्तरावर एकूण आकस्मिक मृत्यूंपैकी ३५,६३७ जण हृदयविकाराने मृत्युमुखी पडले, तर उर्वरित २७,९७२ जण इतर कारणांमुळे मृत्युमुखी पडले. महाराष्ट्रात, हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या १४,१६५ इतकी आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघातानंतर आकस्मिक मृत्यू हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हे मृत्यू पाण्यात बुडणे, विषबाधा किंवा रस्ते अपघात यासारख्या ओळखण्यायोग्य घटनांशी संबंधित नसलेल्या कारणांमुळे होतात. राष्ट्रीय स्तरावर २०२३ मध्ये आकस्मिक मृत्यूचे प्रमाण १४.५ टक्के होते. ते मागील वर्षाच्या तुलनेत १२.३% वाढले. महाराष्ट्रात एकूण अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. 

तामिळनाडू, उ. प्रदेशात अचानक मृत्यू लक्षणीय

एकूण ६९,८०९ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे आकस्मिक होते. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमध्येही अचानक मृत्यूंची लक्षणीय संख्या नोंदवली गेली; परंतु त्यांचा वाटा महाराष्ट्रापेक्षा कमी राहिला. संपूर्ण देशात २०२२ मध्ये आकस्मिक मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५६,६५३ होती. ती २०२३ मध्ये ६३,६०९ झाली. म्हणजेच ६,९५६ प्रकरणांची वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात २,२५७ ने वाढ झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Tops in Accidental Deaths, Shocking NCRB Report Reveals

Web Summary : Maharashtra recorded the highest number of accidental deaths in India, according to NCRB. The state accounted for 33.5% of the country's total, with heart attacks being a major cause. The accidental deaths increased significantly compared to the previous year.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTamilnaduतामिळनाडू