शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

Maharashtra Government: शिवसेनेला गंभीर परिणाम भोगावे लागणार; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांने दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 21:33 IST

सत्तेच्या लालसापोटी अशाप्रकारे भाजपाने कधीही पावलं उचलली नाहीत असंही अश्विनी चौबे यांनी सांगितले. 

वाराणसी - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री अश्विनी चौबे यांनी शिवसेनेला गंभीर इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनता सर्व पाहत आहे. सत्य काय आहे हे त्यांना समजतं. आज नाही तर उद्या याचे गंभीर परिणाम शिवसेनेला भोगावे लागणार असा इशारा अश्विनी चौबे यांनी दिला आहे. 

एका कार्यक्रमासाठी ते वाराणसीला आले होते, त्यावेळी माध्यमाशी बोलताना अश्विनी चौबे म्हणाले की, एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनतेने जो कौल दिला तो शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीला मिळाला होता. शिवसेनेने महायुतीच्या धर्माचं पालन करणं गरजेचे होतं. मात्र त्यांनी तसं केलं नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवसेनेच्या हिंदुत्व मुद्द्यावर बोलताना कोण कोणाला शिकविणार हे सर्व माहित आहे. सत्तेच्या लालसापोटी अशाप्रकारे भाजपाने कधीही पावलं उचलली नाहीत असंही अश्विनी चौबे यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्यापेक्षा भाजपसोबत एकत्र येवून राज्यात सरकार स्थापन करावे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेवून एकत्र सरकार चालवावे. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपने दीड वर्षासाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊन तडजोड करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

दिल्लीत रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून शिवसेना भाजप यांना एकत्र आणून सरकार बनविण्याबाबत विषय मांडला असता त्यांनी सर्व सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची नवी दिल्लीत रामदास आठवले यांची भेट घेवून शिवसेना भाजपने एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना भाजपमधील दुरावा संपवून त्यांना एकत्र आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत मध्यस्थी करण्याचा आज प्रयत्न केला.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019