शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: पवार-मोदी भेटीनंतर भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांनी केलं भाष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:05 IST

त्याचसोबत राज्यसभेत बदललेल्या आसनव्यवस्थेवरुन राऊतांनी भाजपावर निशाणा साधला

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत मोठ्या हालचाली होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र भेटीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चांनी उधाण आलं आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी याचं उत्तर भाजपालाच विचारा असं सांगितलं आहे. 

माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन होईल. महाराष्ट्रात अस्थिरता आहे, पंतप्रधानांना चिंता असेल त्यावर कदाचित हे नेते बोलले असतील. केंद्र सरकारही महाराष्ट्राच्या पाठिशी उभं राहिलं. पंतप्रधान हे एका पक्षाचे नाही, तर देशाचे आहेत. हे राज्य निर्माण होईल तेव्हा त्यांना दिल्लीचा आशीर्वाद असेल असं सांगत अमित शहांनी वारंवार मोदींची भेट घ्यावी असं ते म्हणाले, 

अमित शहा आणि नरेंद्र मोदी भेटीवर राऊतांनी भाष्य केलं. शहा- मोदी यांची वारंवार भेट व्हावी. गृहमंत्री आणि पंतप्रधान यांची भेट झाली त्यात नवल नाही, अनेक गृहखात्याशी बिलं असतील तर भेटले असतील. संसदेचं अधिवेशन सुरु असलेल्यांनी ते भेटले असतील असं संजय राऊतांनी सांगितले. 

तसेच १०० टक्के महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार येईल. महत्वाच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. निर्णय घेतले जात आहे. निश्चितच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनेल. काँग्रेस-राष्ट्रवादीशी व्यवस्थित संवाद झालेला आहे. संध्याकाळी शरद पवारांची छोटी बैठक होऊ शकते असा दावा संजय राऊत यांनी केला. 

त्याचसोबत राज्यसभेत बदललेल्या आसनव्यवस्थेवरुन राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. आम्ही कुठल्याही बाकावर असलो तरी आमचा आवाज सभापतींपर्यंत, देशात पोहचतो. नियमांचे उल्लंघन झालंय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यासाठी राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न आपण पंतप्रधान मोदींकडे मांडला. तसेच या नुकसानीकडे मोदींचे लक्ष वेधल्याचे शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले. मात्र या भेटीदरम्यान कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019