शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: 'महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची; पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 20:57 IST

तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत घडामोडी घडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची जवळपास ३ तासांहून जास्त काळ बैठक सुरु आहे. मात्र याच दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली असं समजा अशा सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक सुरु असताना संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या निवासस्थानाबाहेर राऊत मुलीसोबत फिरत असल्याचं दिसलं. रिलॅक्स मूडमध्ये राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट दूर व्हावी, या राज्यात लोकप्रिय सरकार यावं, सर्व घटनेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष ठेवून आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं होतं गोड बातमी देऊ पण त्यांना ती बातमी देता आली नाही, त्यामुळे महाराष्ट्राला गोड बातमी देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पेढ्याची ऑर्डर दिली आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठक सुरु असताना प्रतिक्रिया दिली.  

तसेच तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार येणार नाही, या तीन पक्षांच्या सरकारला सत्तास्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम बनवावा लागेल. त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी करावी लागेल. दिल्लीत या घडामोडी घडत आहे. शरद पवारांना भेटण्यासाठी जाऊ शकतो. आघाडीच्या बैठकीत काय झालं. याची माहिती उद्धव ठाकरेंना द्यावी लागेल. ही चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाने राज्याच्या हितासाठी अशा आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मान्यता सोनिया गांधी यांनी दिली आहे. सरकार स्थापन होताना प्रमुख नेत्यांशी चर्चा होते. काँग्रेस प्रमुख नेतेच या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री कोण होणार याची माहिती काँग्रेसला दिली आहे. शिवतिर्थावर शपथविधी होईल तेव्हा महाराष्ट्राला कळेल मुख्यमंत्री कोण होणार आहे. पण उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रे हातात घ्यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण हा निर्णय उद्धव ठाकरेंचा आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

ही बैठक सुरु असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बाहेर येऊन संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. सकारात्मक चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर महाराष्ट्रात स्थिर सरकार अस्तित्वात येईल. पुढील २-३ दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आणखी काही गोष्टींवर चर्चा व्हायची बाकी आहे. ती लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितले. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत पर्यायी सरकार देईल अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस