शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:57 IST

भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत.

नवी दिल्ली : भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत. या पक्षाने लोकशाहीचे धिंडवडे काढले असून, तीन पक्षांच्या आघाडीने सरकार स्थापन करू नये म्हणून अनेक अडथळेही आणले, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली आहे.काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या इशाऱ्यावरच काम केले. भाजपच्या अहंकारामुळेच त्यांची शिवसेनेबरोबरची युती टिकू शकली नाही.तीन पक्षांच्या आघाडीच्या मार्गात आणलेल्या अडथळ्यांविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा पुरते उघडे पडले आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी भाजपचे वाईट मनसुबे हाणून पाडेल, असा दावा करून सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी सरकारने सभ्यतेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. देशासमोरील गंभीर समस्या कशा सोडवाव्यात याची या सरकारला जाण नाही. आर्थिक पेचप्रसंगाने गंभीर स्वरूप धारण केले असून, त्यामुळे देशाच्या विकासावरही परिणाम झाला आहे.बेकारी वाढत असून, गुंतवणुकीचा ओघ आटला आहे. शेतकरी, व्यापारी, लघु तसेच मध्यम उद्योजक चिंताक्रांत आहेत. देशाची निर्यात घटली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना रोजचे आयुष्य जगणे त्रासदायक झाले आहे. दुस-या बाजूला मोदी सरकार देशाच्या विकासाबाबत आकड्यांचा फसवा खेळ करण्यात गुंतले आहे. वास्तव दर्शविणारी आकडेवारी प्रसिद्ध करण्यास हे सरकार तयार नाही, असेही त्या म्हणाल्या.उद्योगपतींना उपकृत करण्याचा डावसोनिया गांधी यांनी सांगितले की, काही सार्वजनिक उपक्रम आपल्या मर्जीतील उद्योगपतींच्या घशात घालण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचसाठी या उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. देशातील राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी काँग्रेस नेहमीच लढा देत राहील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019