शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government: निवडणुकीसाठी तयार राहा, भाजपचा फडणवीसांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 03:51 IST

महाराष्ट्रात सत्ता राखण्याच्या खेळात अपेक्षित यश न आल्यानंतरही भाजपने राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता राखण्याच्या खेळात अपेक्षित यश न आल्यानंतरही भाजपने राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास टाकला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी फडणवीस यांना पुढील निवडणुकीसाठीच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे.पक्षाने त्यांच्यावर आपला विश्वास व्यक्त करून हे येऊ घातलेले कोणताही ताळमेळ नसलेले सरकार फार दिवस चालणार नाही त्यामुळे संघर्ष सुरूच ठेवावा लागेल, असे त्यांना सांगितले.सूत्रांनुसार महाराष्ट्रात उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला याची माहिती देऊन खेद जाहीर करून म्हटले की, मी योजनेला अपेक्षित वळण देऊ शकलो नाही. त्यानंतर त्यांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही तुमची चूक नाही, असे म्हटले.अजित पवार जर आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत तर ती त्यांची चूक आहे. तुम्ही पुढील निवडणुकीसाठी कामाला लागले पाहिजे.भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटले की, राज्यातील नियोजित सरकारला आधार नसून ते फार दिवस चालणार नाही. महाराष्ट्र राज्य भाजपला सांगण्यात आले आहे की, तिने तिचा उत्साह कमी होऊ देऊ नये. महाराष्ट्रात बनणार असलेल्या भाजपेतर सरकारच्या चुकीच्या लोकविरोधी धोरणांना घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा कार्यक्र म सुरू केला जावा.आम्हाला आशा आहे की येत्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट होऊ शकते. त्यानंतर राज्यासाठी वेगळ््या रणनीतीवर चर्चा व तिची अमलबजावणी केली जाईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र