शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

Maharashtra Government: भाजपची दीर्घकालीन योजना यशस्वी; शिवसेनेची जागा घेण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 07:06 IST

महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली -  महाराष्ट्रात पुन्हा एकवार भाजपचा मुख्यमंत्री मिळाला आहे; पण केवळ एका राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवणे, हे भाजपचे साध्य नसून, त्यामागे एक दीर्घकालीन योजना आहे आणि त्यात भाजप  यशस्वी झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. महाराष्ट्रातील आपण एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असे भाजपने आता दाखवून दिले आहे, तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करण्यातही भाजपला यश आले आहे.शिवसेना आपल्याबरोबर येत नसल्याचे पाहून भाजपने महाराष्ट्रात आपणच एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहोत, हे दाखवून देण्याची योजना आखली. हिंदुत्ववादी शिवसेननेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा फायदाच झाला. शिवसेनेला कदापि काँग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन करू द्यायचे नाही, असे भाजपच्या केंद्रीय नेत्याने ठरविलेच होते; पण उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राहिलेली नाही, हे दाखवून देणे भाजपला शक्य झाले. खा. संजय राऊ त यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार, असे जाहीर  करताच भाजपने आपले संख्याबळ वाढविण्यास सुरुवात केली. त्यासाठी अजित पवार यांची साथ मिळाली. ती साथ मिळण्याची कारणे सर्वज्ञात आहेत; पण राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळी करण्यासाठी आपल्याबरोबर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी, असे निश्चित करण्यात आले. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे विरोधी पक्षात फूट पडल्याचे दाखवणे सोपे झाले.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती करून हिंदुत्ववादी मतांचा फायदा भाजपने मिळवला होताच. ती झाली नसती, तर भाजपला शिवसेना व राष्ट्रवादीशी लढावे लागले असते. ते त्रासदायक ठरले असते. यापुढे मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीशी निवडणूक समझोता केला, तर हिंदुत्ववादी मते आपल्यालाच मिळतील, असे भाजपने नक्की करून घेतले आहे, याचे कारण त्या दोन्ही पक्षांची ठरलेली मते एकमेकांकडे वळू शकत नाहीत. शिवसेनेची मते आली, तर भाजपकडेच येऊ शकतात.आणखी आमदार संपर्कातपण देवेंद्र फडणवीस सरकार पाच वर्षे राहणार का? या प्रश्नावर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ही तर सुरुवातच आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही पक्षांच्या अनेक आमदारांना एकमेकांसोबत जाणे मान्य नाही. सरकार पडलेच, तर सत्तास्वार्थासाठी शिवसेनेने केलेले प्रयत्न आम्ही जनतेपुढे मांडू, शिवसेनेने जनतेचा कसा विश्वासघात केला, हे सांगू. त्याचा फायदा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.सतत बाळासाहेबांचे नाव घ्याभाजपने आपल्या राज्यातील नेत्यांना सांगितले आहे की, शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर अवश्य टीका करा; पण ते करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कसे तत्त्वाचे राजकारण केले, हेही लोकांना समजावून सांगा. आता बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, तर आम्हीच हिंदूंचे रक्षण करू शकतो, हे आपण लोकांना सांगणे गरजेचे आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019