शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM: आठवलेंचे शिवसेनेला पुन्हा आवाहन; स्व. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 16:55 IST

शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले.

नवी दिल्ली - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवसेनेने काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापन न करता भाजपसोबत सरकार स्थापन करावे. असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या 7 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना रामदास आठवले यांनी अभिवादन केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत उपराष्ट्रपती बोलावलेल्या बैठकीस तसेच सर्व पक्षीय बैठकीस उपस्थित राहण्यास रामदास आठवले दिल्लीत असल्यामुळे त्यांना मुंबईत शिवाजी पार्क येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळ स्मारकास आज भेट देता आली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना स्थापन केली. देशभर शिवसेना वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते अत्यंत डॅशिंग आक्रमक नेते आणि वक्ते होते. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरुन हटविण्यासाठी शिवशक्ती भिमशक्तीची एकजूट उभारली. शिवशक्ती भीमशक्ती ऐक्याचे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या रिपब्लिकन पक्षाने त्यांना साथ दिली. 

शिवशक्ती भीमशक्तीमुळे राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना भाजप महायुतीचे सरकार आले. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करण्यापेक्षा भाजपसोबत एकत्र येवून राज्यात सरकार स्थापन करावे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडून द्यावा आणि उपमुख्यमंत्री पद घेवून एकत्र सरकार चालवावे. मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेचा फार आग्रह असल्यास भाजपने दीड वर्षासाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देऊन तडजोड करावी असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

दिल्लीत रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून शिवसेना भाजप यांना एकत्र आणून सरकार बनविण्याबाबत विषय मांडला असता त्यांनी सर्व सुव्यवस्थित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची नवी दिल्लीत रामदास आठवले यांची भेट घेवून शिवसेना भाजपने एकत्र सरकार स्थापन करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना भाजपमधील दुरावा संपवून त्यांना एकत्र आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्लीत मध्यस्थी करण्याचा आज प्रयत्न केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAmit Shahअमित शहाSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019