शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 19:44 IST

आत्मविश्वासाला बळी जाऊ नका आणि जमिनीवर प्रत्यक्ष जोडून मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करा असंही केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीत काँग्रेस पक्षनेतृत्वाने चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केली. हरियाणातील निकालाची गंभीर दखल घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशाराच हायकमांडने दिला आहे. महाराष्ट्राला हरियाणा बनू देणार नाही. मराठा-ओबीसी संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर पडण्याच्या शक्यतेने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आले आहे.

काँग्रेस नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना देण्यात आल्यात की, मराठा-ओबीसी यांच्यातील संघर्षत दोन्ही समाजात एकोपा राहील असं प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी सरकार आणायचं आहे. या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना ३ महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यात पहिला आदेश मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल, या वादात पडू नका. ते काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व निश्चित करेल. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी पक्षांतर्गत गटबाजी अथवा आघाडीत गटबाजी करू नये असं स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

दुसऱ्या आदेशात कुठल्याही प्रकारे आघाडीत वादग्रस्त जागांवर चर्चा करू नका. ज्या जागांबाबत आघाडीत वाद आहे, उद्धव ठाकरे अथवा शरद पवारांचा पक्ष दावा करत असेल तर अशा जागांबाबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. त्यासाठी आघाडीच्या पातळीवर वादाची परिस्थिती बनवू नका. त्याशिवाय तिसऱ्या आदेशात काँग्रेस हायकमांडनं जाहिरनाम्यावर चर्चा करू नका अशा सूचना महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. केंद्रीय नेते जाहिरनामा निश्चित करतील, तुम्ही जनतेशी संपर्कात राहून काम करा. जनतेत जाऊन काँग्रेसने केलेल्या कामांची आठवण करून द्या. केवळ सत्ताधारी पक्षाच्या टीकेच्या आधारे राहू नका. आत्मविश्वासाला बळी जाऊ नका आणि जमिनीवर प्रत्यक्ष जोडून मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करा असंही केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असणार?

महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुख्य फोकस असेल. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दर महिना ४ लाख, महिलांना मोफत बस प्रवास, महालक्ष्मी योजनेतून दर महिना २ हजार रुपये थेट खात्यात जमा करणार अशा लोकप्रिय घोषणांचा समावेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो. त्याशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांसाठीही विविध घोषणा केल्या जाऊ शकतात.  

टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे