शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 19:44 IST

आत्मविश्वासाला बळी जाऊ नका आणि जमिनीवर प्रत्यक्ष जोडून मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करा असंही केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीत काँग्रेस पक्षनेतृत्वाने चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केली. हरियाणातील निकालाची गंभीर दखल घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशाराच हायकमांडने दिला आहे. महाराष्ट्राला हरियाणा बनू देणार नाही. मराठा-ओबीसी संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर पडण्याच्या शक्यतेने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आले आहे.

काँग्रेस नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना देण्यात आल्यात की, मराठा-ओबीसी यांच्यातील संघर्षत दोन्ही समाजात एकोपा राहील असं प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी सरकार आणायचं आहे. या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना ३ महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यात पहिला आदेश मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असेल, या वादात पडू नका. ते काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व निश्चित करेल. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी पक्षांतर्गत गटबाजी अथवा आघाडीत गटबाजी करू नये असं स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

दुसऱ्या आदेशात कुठल्याही प्रकारे आघाडीत वादग्रस्त जागांवर चर्चा करू नका. ज्या जागांबाबत आघाडीत वाद आहे, उद्धव ठाकरे अथवा शरद पवारांचा पक्ष दावा करत असेल तर अशा जागांबाबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. त्यासाठी आघाडीच्या पातळीवर वादाची परिस्थिती बनवू नका. त्याशिवाय तिसऱ्या आदेशात काँग्रेस हायकमांडनं जाहिरनाम्यावर चर्चा करू नका अशा सूचना महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. केंद्रीय नेते जाहिरनामा निश्चित करतील, तुम्ही जनतेशी संपर्कात राहून काम करा. जनतेत जाऊन काँग्रेसने केलेल्या कामांची आठवण करून द्या. केवळ सत्ताधारी पक्षाच्या टीकेच्या आधारे राहू नका. आत्मविश्वासाला बळी जाऊ नका आणि जमिनीवर प्रत्यक्ष जोडून मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करा असंही केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असणार?

महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुख्य फोकस असेल. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दर महिना ४ लाख, महिलांना मोफत बस प्रवास, महालक्ष्मी योजनेतून दर महिना २ हजार रुपये थेट खात्यात जमा करणार अशा लोकप्रिय घोषणांचा समावेश काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो. त्याशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांसाठीही विविध घोषणा केल्या जाऊ शकतात.  

टॅग्स :congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे