शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:19 IST

लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या.

सोशल मीडियाचे जसे तोटे आहेत, तसे अनेक फायदेही आहेत. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोचस ब्लॉकमधील बलथरी गावातील रहिवासी लाखपातो देवी महाकुंभात पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. पण त्या तिथे हरवल्या. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने लाखपातो देवी आपल्या घरी परत आल्या आहेत. 

२४ फेब्रुवारी रोजी लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. कुटुंबाने दोन दिवस त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. अखेर १५ दिवसांनी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील बहियारपूर खुर्द पंचायतीत त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. पंचायत प्रमुख सोनी देवी यांच्या प्रयत्नांमुळे महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबाकडे परत पाठवण्यात आलं आहे. 

बहियारपूर खुर्द पंचायत प्रमुख सोनी देवी यांचे पती वीरेंद्र बैठा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी एक ६० वर्षांची महिला त्यांच्या घरी आली आणि काहीतरी बोलू लागली. या महिलेला पत्नीने जेवण दिलं आणि तिच्या राहण्याची व्यवस्था केली. यानंतर ओळखीच्या, पंचायत प्रमुख अंजनी सिंहशी संपर्क साधला आणि महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सोशल मीडियाने आई आणि मुलाला आणलं जवळ

जेव्हा लाखपातो देवीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मुलगा राहुल कुमारने तो पाहिला. तो ताबडतोब झारखंडमधील गढवा येथे गेला, त्याच्या आईला ओळखलं आणि तिला घरी परत आणलं. राहुलने सांगितलं की त्याच्या आईला गढवा येथील विष्णू देव पासवान यांच्या घरी आसरा मिळाला, जिथे तिला प्रेम मिळालं आणि तिची काळजी घेतली.

महाकुंभात नातेवाईक दोन दिवस घेत होते शोध

राहुल कुमार म्हणाला की, त्याची आई २४ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात हरवली होती, त्यानंतर कुटुंबाने दोन दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि शेवटी तो गावी परतला.

सोशल मीडियाचे आभार

१० मार्च रोजी जेव्हा आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राहुलला माहिती मिळाली. भावनिक होत राहुल म्हणाला की, सोशल मीडियामुळे मला माझी आई पुन्हा भेटली. या घटनेने हे सिद्ध केलं की आजच्या डिजिटल युगात जर सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर केला तर दूर गेलेल्या लोकांना पुन्हा जोडण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलKumbh Melaकुंभ मेळाBiharबिहारJharkhandझारखंड