शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:19 IST

लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या.

सोशल मीडियाचे जसे तोटे आहेत, तसे अनेक फायदेही आहेत. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोचस ब्लॉकमधील बलथरी गावातील रहिवासी लाखपातो देवी महाकुंभात पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. पण त्या तिथे हरवल्या. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने लाखपातो देवी आपल्या घरी परत आल्या आहेत. 

२४ फेब्रुवारी रोजी लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. कुटुंबाने दोन दिवस त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. अखेर १५ दिवसांनी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील बहियारपूर खुर्द पंचायतीत त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. पंचायत प्रमुख सोनी देवी यांच्या प्रयत्नांमुळे महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबाकडे परत पाठवण्यात आलं आहे. 

बहियारपूर खुर्द पंचायत प्रमुख सोनी देवी यांचे पती वीरेंद्र बैठा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी एक ६० वर्षांची महिला त्यांच्या घरी आली आणि काहीतरी बोलू लागली. या महिलेला पत्नीने जेवण दिलं आणि तिच्या राहण्याची व्यवस्था केली. यानंतर ओळखीच्या, पंचायत प्रमुख अंजनी सिंहशी संपर्क साधला आणि महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सोशल मीडियाने आई आणि मुलाला आणलं जवळ

जेव्हा लाखपातो देवीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मुलगा राहुल कुमारने तो पाहिला. तो ताबडतोब झारखंडमधील गढवा येथे गेला, त्याच्या आईला ओळखलं आणि तिला घरी परत आणलं. राहुलने सांगितलं की त्याच्या आईला गढवा येथील विष्णू देव पासवान यांच्या घरी आसरा मिळाला, जिथे तिला प्रेम मिळालं आणि तिची काळजी घेतली.

महाकुंभात नातेवाईक दोन दिवस घेत होते शोध

राहुल कुमार म्हणाला की, त्याची आई २४ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात हरवली होती, त्यानंतर कुटुंबाने दोन दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि शेवटी तो गावी परतला.

सोशल मीडियाचे आभार

१० मार्च रोजी जेव्हा आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राहुलला माहिती मिळाली. भावनिक होत राहुल म्हणाला की, सोशल मीडियामुळे मला माझी आई पुन्हा भेटली. या घटनेने हे सिद्ध केलं की आजच्या डिजिटल युगात जर सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर केला तर दूर गेलेल्या लोकांना पुन्हा जोडण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलKumbh Melaकुंभ मेळाBiharबिहारJharkhandझारखंड