शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

सोशल मीडियाची कमाल, आई-मुलाची भेट; महाकुंभात हरवलेली महिला १५ दिवसांनी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 15:19 IST

लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या.

सोशल मीडियाचे जसे तोटे आहेत, तसे अनेक फायदेही आहेत. अशीच एक आश्चर्यकारक घटना आता समोर आली आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील कोचस ब्लॉकमधील बलथरी गावातील रहिवासी लाखपातो देवी महाकुंभात पवित्र स्नानासाठी गेल्या होत्या. पण त्या तिथे हरवल्या. अखेर सोशल मीडियाच्या मदतीने लाखपातो देवी आपल्या घरी परत आल्या आहेत. 

२४ फेब्रुवारी रोजी लाखपातो देवी आपल्या कुटुंबासह महाकुंभ स्नानासाठी गेल्या होत्या, परंतु तिथे प्रचंड गर्दी असल्याने त्या कुटुंबापासून वेगळ्या झाल्या. कुटुंबाने दोन दिवस त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आलं नाही. अखेर १५ दिवसांनी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील बहियारपूर खुर्द पंचायतीत त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. पंचायत प्रमुख सोनी देवी यांच्या प्रयत्नांमुळे महिलेला सुखरूप तिच्या कुटुंबाकडे परत पाठवण्यात आलं आहे. 

बहियारपूर खुर्द पंचायत प्रमुख सोनी देवी यांचे पती वीरेंद्र बैठा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एके दिवशी एक ६० वर्षांची महिला त्यांच्या घरी आली आणि काहीतरी बोलू लागली. या महिलेला पत्नीने जेवण दिलं आणि तिच्या राहण्याची व्यवस्था केली. यानंतर ओळखीच्या, पंचायत प्रमुख अंजनी सिंहशी संपर्क साधला आणि महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सोशल मीडियाने आई आणि मुलाला आणलं जवळ

जेव्हा लाखपातो देवीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मुलगा राहुल कुमारने तो पाहिला. तो ताबडतोब झारखंडमधील गढवा येथे गेला, त्याच्या आईला ओळखलं आणि तिला घरी परत आणलं. राहुलने सांगितलं की त्याच्या आईला गढवा येथील विष्णू देव पासवान यांच्या घरी आसरा मिळाला, जिथे तिला प्रेम मिळालं आणि तिची काळजी घेतली.

महाकुंभात नातेवाईक दोन दिवस घेत होते शोध

राहुल कुमार म्हणाला की, त्याची आई २४ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात हरवली होती, त्यानंतर कुटुंबाने दोन दिवस तिला शोधण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला यश मिळाले नाही तेव्हा त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आणि शेवटी तो गावी परतला.

सोशल मीडियाचे आभार

१० मार्च रोजी जेव्हा आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा राहुलला माहिती मिळाली. भावनिक होत राहुल म्हणाला की, सोशल मीडियामुळे मला माझी आई पुन्हा भेटली. या घटनेने हे सिद्ध केलं की आजच्या डिजिटल युगात जर सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर केला तर दूर गेलेल्या लोकांना पुन्हा जोडण्याची संधी मिळेल. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलKumbh Melaकुंभ मेळाBiharबिहारJharkhandझारखंड